कोल्हापूर - जिल्ह्यातील विविध भागात आज बुधवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय जिल्ह्यातील विविध भागात दिवसभरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सोमवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला होता. आज पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने भाजीपाल्यासह गुऱ्हाळ घरांना याचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.
शहरात रात्री ८ च्या सुमारास जोरदार पाऊस -