कोल्हापूर - अखिल भारतीय संत साहित्य परिषदेच्या आठव्या साहित्य संमेलनाचा मान यावर्षी कोल्हापूरला मिळाला आहे. या संमेलनाची सुरुवात शनिवारी ग्रंथदिंडीने झाली. कोल्हापुरातील गांधी मैदानात पुढील तीन दिवस हे संमेलन सुरू राहणार आहे.
शनिवारी सकाळी भवानी मंडप येथून टाळ मृदुंगाच्या गजरात महापौर अॅड. सुरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते ग्रंथ आणि अश्व पूजन झाले. यानंतर ग्रंथ दिंडीची सुरुवात झाली. लहान मुले, ज्येष्ठ वारकऱ्यांच्यासह महिला या दिंडीमध्ये सहभागी झाल्या. झांज पथकाच्या ठेक्यावर मुलींनी लेझीम सादर केली.