महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिवाळीच्या पूर्वसंध्येला बदनापूर बाजारपेठेत प्रचंड गर्दी; वाहतुकीची कोंडी

दिवाळी निमित्त बदनापुरातील बाजारपेठा सजल्या आहेत.त्यातच आज बदनापुराचा आठवडी बाजार असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. परिणामी या बाजारातूनच जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

By

Published : Nov 13, 2020, 5:48 PM IST

Updated : Nov 13, 2020, 5:54 PM IST

badanapur latest news
बदनापूर बाजारपेठेत प्रचंड गर्दी; वाहतुकीची कोंडी

बदनापूर (जालना) - प्रशासन तसेच विविध सामाजिक संघटनेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र बदनापूर शहरात शुक्रवारी दिपावलीच्या पूर्वसंध्येला शहरातील मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. आज बदनापूरचा बाजार असल्याने आणि उद्या दिवाळी असल्याने गर्दीचे प्रमाण जास्त आहे. मात्र, या गर्दीमुळे औरंगाबादकडून जालनाकडे जाणाऱ्या महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या दीड ते दोन कीलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या होत्या.

कोरोनाचे सावट असले तरी उत्साह-

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळातील सर्व सण नागरिकांनी शांततेत व गर्दी होऊ न देता साजरे केले. मात्र, लॉक उठवल्यानंतर दिवाळी हा पहिलाच सण फारसे निर्बंध न पाळता साजरा करण्याची मुभा मिळाली आहे. परिणामी दिवाळीसण साजरा कण्यासाठी गावोगावच्या नागरिकांनी आज बदनापूरच्या बाजारात खरेदीसाठी गर्दी केली आहे. आरोग्य विभागाने डिसेंबरअखेर दुसरी लाट येणार असे संकेत दिलेले असल्यामुळे कोरोनाचे सावट असले तरी नागरिकांमध्ये दिवाळी सणाचा उत्साह अधिक असल्याचे दिसून येत आहे.

दिवाळीच्या गर्दीमुळे वाहतुकीची मोठी कोंडी

कपडे, वाहन व पूजेचे साहित्य विक्री दुकानात गर्दी-

गाव-खेडयातील ग्रामस्थ दिवाळीला कपडे खरेदी करतात. त्यामुळे कापड दुकानात खरेददारी जास्त दिसून येत असतानाच दुचाकी विक्री करणाऱ्या दुकानातही वाहन खरेदी होताना दिसून येतळ आहे. तसेच दिवाळीनिमित्त लागणारे साहित्य, दिवे, आकाश कंदिल, लायटिंग व पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांवरही प्रचंड गर्दी पहायला मिळाली.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला बदनापूर बाजारपेठेत प्रचंड गर्दी
गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी-बदनापूर येथील आठवडी बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात भरवण्यात येतो. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरच खरेदी करणाऱ्या गावकऱ्यांच्या होणाऱ्या गर्दीमुळे औरंगाबाद–जालना हा चार पदरी मुख्य रस्त्यावर झालेल्या गर्दीमुळे प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहनांच्या रांगा थेट दीड ते दोन किलोमीटरपर्यंत झाल्या होत्या. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी बाजारपेठेत होणारी गर्दी हटवत वाहतूक कोंडी टाळण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, दिवाळीच्या गर्दीमुळे कोंडी सोडवण्यास अडचणी निर्माण होत आहेत.


फटाक्याच्या दुकानांवर बंदी-

बदनापूर नगर पंचायतने या वर्षी दिवाळीनिमित्त फटाका बाजार लावण्यास मनाई केलेली आहे. या बाबत नगर पंचायतचे अभियंता गणेश ठुबे यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदनापूर नगर पंचायतने स्त्युत्य निर्णय घेऊन फटाका दुकानांना परवानगी दिलेली नाही, तसेच ज्यांना फटाका दुकानांची परवानगी होती. त्यांचीही परवानगी या दरम्यान रद्द करण्यात आलेली असून फटाकेमुक्त दिवाळी साजरे करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

Last Updated : Nov 13, 2020, 5:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details