औरंगाबाद - राज्याचा रेल्वे निधी वाढला - बाहेरून मंत्री आल्यावर स्थानिक नेत्यांना आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. आजपर्यंत आम्ही अनेक वेळा मागण्या केल्या. मात्र, त्या अद्याप त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. २००९ पासून २०१४ पर्यंत महाराष्ट्राला अकराशे कोटी मिळत होते. आता अकरा हजार करोड रुपये मिळत आहेत. हे महाराष्ट्राला मिळत आहेत आणि ते महाराष्ट्रासाठी खर्च होतात. २०२३ पर्यंत रेल्वेचे इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण होईल. टीका करणारे असतात. विजेवर रेल्वे चालली तर पैसे वाजतील. बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत असही ते म्हणाले आहेत. मराठवाड्यात लातूर येथे शंभर वंदेमातरम रेल्वे गाड्या तयार होत आहेत. औद्योगिक विकास होत आहेत. सर्व काम पूर्ण झाली तर विरोधकांना बोलायला काही राहणार नाही अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली आहे. पुढच्या निवडणुकीत काय मुद्दे असतील असा प्रश्न त्यांना पडेल. यावेळी औरंगाबादसाठी १८० कोटी खर्च करून विकास होणार, वेरूळ लेणी नुसार आधारावर डिझाईन होईल. जालना स्टेशनसाठी देखील निधी देण्यात आला असही दानवे म्हणाले आहेत.
एकाच वेळी अनेक स्टेशनचे काम - दोनशे स्टेशन एकाच वेळी डिझाईन तयार झाले आहेत. त्यात ३२ स्टेशनवर काम सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रेल्वेशी लहानपनापासून भावनिक नाते आहे अस केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. रेल्वे स्टेशन विकसित होत आहेत. युरोप आणि जपानपेक्षा अधिक चांगले एक पाऊल पुढे जाऊन टाकणार आहोत. यामध्ये आधुनिक गाड्यांसह २०० स्टेशन निर्मिती होणार आहे असही ते म्हणाले आहेत. तसेच, जागतिक दर्जाच्या गाड्या सुरू होतील असही ते म्हणाले आहेत.