जालना - बदनापूर तालुक्यातील दुधनवाडी गाव सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्पात गेले. पुनर्वसन होऊन ५६ वर्षे उलटूनही हे गाव कोणत्या ठिकाणी पुनर्वसित झाले याबाबत जालना जिल्ह्याच्या नकाशात अधिकृत नोंद नाही. त्यामुळे नागरिकाना झोन चारचे दाखले मिळत नाही. यामुळे दुधनवाडीच्या गावकऱ्यांनी कुटुंबियांसह व गावातील गुरा-ढोरांसह प्रजासत्ताक दिनी दुधना प्रकल्पात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.
बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे अप्पर दुधना प्रकल्प सन १९५९ साली मंजूर झाला होता. १९६० मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. या प्रकल्पामध्ये जालन्यातील दुधनवाडी, व औरंगाबादमधील ढवळापुरी या दोन गावांचे पुनर्वसन करण्यात आले. दुधनवाडी गावातील सर्व गावकऱ्यांनी शासनाच्या आदेशाला संमती देऊन स्वत:च्या जमिनी व घरे स्वखुशीने दिली. १९६४ मध्ये या गावाचे पुनर्वसन सोमठाणा येथील सर्वे क्रमांक ९० व गट क्रमांक ३५४ मध्ये करण्यात आले.
५४ वर्षानंतरही नकाशावर नाही
१९६४ साली पुनर्वसित झालेले दुधनवाडी हे गाव ५४ वर्षानंतरही जालना जिल्ह्याच्या नकाशावर आलेच नाही. या बाबत या गावातील नागरिकांनी वारंवार तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, आमदार-मंत्री यांना निवेदने देऊन बैठका घेतल्या. दुधनवाडी येथील झोन-४चा दाखला मागितला तर त्यांच्याकडून या गावाचे अतिक्रमण झाले आहे, अशी उत्तरे मिळतात. त्यामुळे शासनाच्या विविध सवलती, बँक कर्ज आदी या गवाकऱ्यांना मिळत नाही.
चुकीचे कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा -