महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना बाजार समितीत कापूस खरेदीला सुरुवात, सहा हजारांचा भाव - cotton rate in jalna news

जालना कृषी उत्पन्न बाजारसमितीचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते काट्याचे पूजन करून पहिल्या वाहनातील कापसाची खरेदी करण्यात आली. यावेळी सदर शेतकऱ्याचा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सत्कार करून त्याच्या कापसाला भाव 6 हजार रुपये देण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांतही आनंद व्यक्त होत आहे.

जालन्यात कापूस खरेदीस सुरुवात
जालन्यात कापूस खरेदीस सुरुवात

By

Published : Oct 25, 2020, 5:47 PM IST

जालना - सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले असून परिसरातील शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत. त्या कापसाची व्यापारी बेभाव खरेदी करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, येथील सत्यनारायण जिनिंग अँड प्रेसिंग येथे कृषी उत्पनन बाजार समितीचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री अर्जुन खेातकर यांच्या हस्ते कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी आलेल्या कापसास सहा हजार रुपयांचा भाव देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांतही आनंद व्यक्त होत आहे.

यावर्षी केंद्र सरकारने कापसाचा हमी भाव 5 हजार 825 रुपये ठरवलेला आहे. बदनापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली, तसेच सततच्या पावसाने कापूस वेचणीपूर्वी व वेचणीनंतरही भिजल्यामुळे शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण झाले होते. त्यातच शासकीय कापूस विक्री केंद्र सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावा लागत होता. सध्या दसरा–दिवाळीचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांचा हा कापूस भिजलेला असल्याचा ठपका ठेऊन बाजारात 4 हजार 100 ते 4 हजार 600 रुपयांप्रमाणे व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात येत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा व कापूस विक्री सोपी व्हावी म्हणून तालुक्यातील राजेंद्र तापडिया, पवन तापडिया, शामसुंदर तापडिया यांनी पुढाकार घेऊन सत्यनारायण जिनिंग व प्रेसिंग येथे दसऱ्याच्या मुहुर्तावर कापूस खरेदी सुरू केली.

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते काट्याचे पूजन करून पहिल्या वाहनातील कापसाची खरेदी करण्यात आली. यावेळी सय्यद चाँद या शेतकऱ्याचा कापूस खरेदी करण्यात आला. या शेतकऱ्याचा अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सत्कार करून त्याच्या कापसाला भाव 6 हजार रुपये देण्यात आला. 12 टक्क्यांपेक्षा कमी आद्रता असेल तर तो कापूस खरेदी करण्यात येऊन त्याला चांगला भाव मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांतही आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

या कापूस खरेदी शुभारंभ प्रसंगी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह माजी आमदार संतोष सांबरे, युवा सेनेचे राज्य समन्व्यक अभिमन्यू खोतकर, शिवसेना तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, भानुदास घुगे, कैलास चव्हाण, वसंत जगताप, भाऊसाहेब घुगे, हरीचंद्र शिंदे, राजेश जऱ्हाड, पद्माकर जऱ्हाड, महादू गिते, नंदकिशोर दाभाडे, बाबासाहेब कऱ्हाळे, बळीराम मोरे, गजानन गिते, जगन्नाथ बरगाजे, शेख समीर, शिकूर बाबा मिर्झा, महेश जोशी, कैलास खैरे, धरम कटारिया यांच्यासह मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा -विशेष : उद्योजकांच्या दूरदृष्टीमुळे जालन्यातील औद्योगिक वसाहत अल्पावधीतच पूर्वपदावर

ABOUT THE AUTHOR

...view details