जालना- शिवसेना पक्ष आपला पाया हरवून बसली आहे, आपल्या भूमिकांत पासून दूर जाऊन ती सध्या गोंधळलेल्या अवस्थेत आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज शिवसेनेवर केली आहे. पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचार निमित्तते आज जालन्यात आले होते. माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली.
या तीन मुद्द्यांपासून शिवसेना गेली दूर-
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना लढत होती. शिवसेनेसाठी आणि मराठी माणसांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा होता, त्यानंतर हिंदुत्वासाठी लढणारी शिवसेना आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 80 टक्के समाजकारण म्हणत सामाजिक बांधिलकी जपणारी या तिन्ही महत्वाच्या मुद्द्यांपासून शिवसेना दुरावली आहे. 20 टक्के राजकारण करणारी शिवसेना आता भरकटलेली आहे, गोंधळलेली आहे. त्यामुळे मराठी माणसाची अस्मिता ही शिवसेनेची जवळ राहिली नाही. त्यामुळे लव्ह जिहाद सारख्या प्रश्नावर दोन महिन्यांपूर्वी आदित्यनाथ यांचे कौतुक करणारी शिवसेना आज लव्ह जिहादचा धोका नसल्याचे म्हणत आपल्या भूमिकांपासून दूर जाताना दिसत असल्याची टीकाही दरेकरांनी केली आहे.