जालना - जिल्ह्यात पाच जुलैपासून दहा दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली होती. आज संचारबंदीच्या शेवटच्या दिवशी 52 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान संचारबंदी मुळे कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आल्याचा दावाही केला जात आहे. मंगळवारी एकही रुग्ण पॉझिटिव्ह निघाला नाही, त्यामुळे या दाव्यात तथ्य आहे. मात्र, आज पुन्हा 52 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष बाब म्हणजे, या 52 पैकी 50 रुग्ण हे जालना शहरातील आहेत.
जालना शहरात निष्पन्न झालेल्या रुग्णांमध्ये माणिक नगर 10, कन्हैया नगर 6, मंमादेवी नगर 4, समर्थ नगर 3, रामनगर 2, एसटी कॉलनी 2 रुग्णांचा समावेश आहेत. तर उर्वरित रुग्ण हे शकुंतला नगर, तेरापंथी नगर, नाथबाबा गल्ली, महावीर चौक, भाग्यनगर, बरवार गल्ली, आयोध्या नगर, भीम नगर येथील आहेत.