महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 8:05 AM IST

ETV Bharat / state

Maratha Reservation Protest : एकच मिशन, मराठा आरक्षण.. आरक्षण जालन्यातील 245 गावांत राजकीय पुढाऱ्यांना 'गावबंदी'

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षण आंदोलनानं आता उग्र रुप घेतलं आहे. जालना जिल्ह्यातील तब्बल 245 गावांत पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्यी डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

Maratha Reservation Protest
मनोज जरांगे पाटील

जालना Maratha Reservation Protest : अंतरवली सराटी इथं मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलन आता गावागावात पोहोचलय.. मनोज जरांगे पाटील आरक्षणावर आज त्यांची दिशा ठरवणार आहेत. मात्र त्यापूर्वीच जालना जिल्ह्यातील 245 गावांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. या गावात कोणत्याही पुढाऱ्यांनी येऊ नये, असे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात मराठा आंदोलन आणखी चिघळणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करणारे बॅनर

जालन्यातील 245 गावांमध्ये राजकीय पुढार्‍यांना गावबंदी :सकल मराठा समाजाच्या वतीनं राजकीय नेत्यांविरोधात वातावरण तापू लागल्याचं चित्र निर्माण होत आहे. जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 245 गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. गावाबाहेर वेशीवर तशा प्रकारचे बॅनरसुद्धा लावलेले दिसून येत आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावामध्ये कोणत्याही पक्षाच्या राजकीय पुढार्‍यांना प्रवेश नाही, अशा प्रकारचे बॅनर जाहीरपणे लावण्यात आले आहेत. मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचं काही गावांनी जाहीर केलं आहे. मराठा आरक्षण हा मुद्दा आता किती पेटला आहे, हेच यावरून दिसून येत आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात पुढाऱ्यांना येऊ देणार नाही, असा इशारा गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे. यामुळे राजकीय नेत्यांची मोठी कोंडी झाली आहे.

राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करणारे बॅनर

आज मनोज जरांगे मांडणार भूमीका :अंतरवाली सराटी इथं शांततेत सुरू आसलेल्या आंदोलनावर पोलिसांचा लाठी हल्ला झाल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलं. या आंदोलनाला एक व्यापक वळण मिळालं. तमाम मराठा समाज बांधवांनी स्वतःला या आंदोलनाशी जोडून घेतलं. परिणामी एका छोट्याशा अंतरवाली सराटी गावातून सुरू झालेलं हे आंदोलन राज्यव्यापी आंदोलन बनलं. अशातच आता सरकारला दिलेला चाळीस दिवसाचा अल्टिमेटम सुद्धा 24 ऑक्टोबरला संपत आहे. त्यानंतर मराठा आंदोलनाची रणनीती काय असेल, यासाठी 22 तारखेला मनोज जरांगे पाटील यापुढील आंदोलन कसं असणार, हे अंतरवाली सराटी इथं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.

राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करणारे बॅनर

मराठा आरक्षण आंदोलन सरकारला पेलणार नाही :सरकारनं 24 तारखेला मराठा आरक्षण जाहीर केलं नाही, तर त्यानंतरचं आंदोलन सरकारला पेलणार नाही, असं मनोज जरांगे पाटील वारंवार सांगत आहेत. त्यावरुन 24 ऑक्टोबरनंतर मराठा आंदोलनाची व्याप्ती फार मोठी असण्याची शक्यता दिसून येत आहे. असं असलं तरी आपल्या प्रत्येक सभेमध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला शांतता आणि संयमानं आंदोलन करण्याच्या वारंवार सूचना करत आहेत.

मराठा आंदोलनाची व्याप्ती वाढली :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाच्या हाकेला संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजानं साथ दिली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज चांगलाच एकवटल्याचं चित्र महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे. अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण असो किंवा त्यानंतर केलेला त्यांचा संवाद दौरा असो, मराठा समाजानं आरक्षण आंदोलन सक्रिय केलं. 14 ऑक्टोबरच्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेनंतर सर्व रेकार्ड मोडीत काढून मराठा आंदोलनाची व्याप्ती वाढली.

हेही वाचा :

  1. Maratha Reservation :...म्हणून मराठा समाजाच्या आशा पुन्हा पल्लवित; पण काँग्रेस म्हणते, सरकार...
  2. Manoj Jarange Patil Sabha : विशेष अधिवेशन बोलून मराठा आरक्षण पारित करा; मनोज जरांगेंची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details