जालना -भोकरदन परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
गारपीटीमुळे गहू, ज्वारी, हरभरा, कांदा आदी पिकांना मोठा फटाका बसला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
भोकरदन तालुक्यातील मालखेडा परिसरात वादळी वारा व गारपीटीमुळे मोठे नुकसान झाले. सांडू संपत घोडके यांच्या शेतातील दोन एकर डाळिंब, दीड एकर कांदा, एक एकर हरभरा आदी पिकांचे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मालखेडामध्ये बाबूराव सुरासे, भगवान भिका घोडके, मधुकर मिरगे, सुधाकर सोनवणे, मुकुंदा मिरगे यांच्या पिकांचेही नुकसान झाले.
'या' गावांना बसला गारपीटीचा फटका -