जालना- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सर्व उद्योगधंदे बंद असल्यामुळे अनेक मजुरांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे समाजातील गोरगरीब, निर्वासित, बेघर असलेल्यांना 'अन्नछत्र संघटन'च्या वतीने जेवण वाटप करण्यात येत आहे.
या संघटनेच्या माध्यमातून शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये गरजूंना अन्न पुरवले जात आहे. तसेच रविवारी आणि मंगळवारी 2 दिवस उत्तरप्रदेशला निघालेल्या रेल्वेतील कामगारांनाही 2 वेळचे जेवण या संघटनेच्या वतीने देण्यात आले.