महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 24, 2021, 10:11 AM IST

ETV Bharat / state

गरजूंना मोफत २५० जीवनावश्यक किटचे वाटप; सामजिक कार्यकर्त्याचा स्तुत्य उपक्रम

राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आले. अशा परिस्थितीमध्ये अनेक गोरगरिब नागरिकांचे हाल होत आहेत. अशा नागरिकांना मदत म्हणून भोकरदनमध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.

Jalna
Jalna

जालना -सध्या महाराष्ट्रात कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रूग्ण संख्या झपाट्याेने वाढत असल्याने प्रशासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंचे भावही गगनाला भिडले आहेत. गरीबांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शहरातील गोरगरीबांना सामजिक कार्यकर्ते शमीम भाई मिर्झा यांच्यावतीने २५० जीवनावश्यक किटचे मोफत वाटप करण्यात येत आहे. यामध्ये साखर, गोडतेल, हरबरा डाळ, पोहे, साबण, चहापावडर, मीठ पुडी अशा सात जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.

कोरोनामुळे गोर गरीबांचे हाल होत आहेत. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले असून उपसामार होण्याची भिती आहे. कोणी बडा नेता मदत करेल का? अशी आशा मनात धरून ते मदतीची वाट बघत आहे. मात्र, कोणीही या गरीब नागरिकांना मदत करण्यास पुढे येताना दिसून नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत करण्यास सुरुवात केली आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावी -

लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यात गोरगरिबांच्या हाताला काम नाही. यामुळे गोरगरिब व हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. माझ्यावतीने थोडशी मदत व्हावी म्हणून स्वखर्चातून २५० जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे मोफत वाटप मी भोकरदन शहरात केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमित मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सचे पालन करून गर्दीच्या ठिकाणी जावू नये, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शमीम भाई मिर्झा यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details