महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील मोठ्या धरणांमधील गाळ काढणार; जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती - water resource minister girish mahajan in jalgaon

राज्यात आजपर्यंत जितका निधी सिंचनासाठी व प्रकल्पांसाठी आलेला नाही तितका निधी या पाच वर्षात आला आहे. गेल्या दहा वर्षात काँग्रेस व राष्ट्रवादीतील भानगडींमुळे राज्यातील अपूर्ण प्रकल्पांसाठी सुधारित निधीला मान्यता देण्यात आली नव्हती. मात्र, भाजप सरकारने राज्यातील रखडलेल्या सर्व प्रकल्पांसाठी सुधारित निधी मंजूर केला. आम्ही एकही नवा प्रकल्प हाती घेतला नाही. ८० ते ८५ टक्के काम झालेले मात्र, रखडलेले प्रकल्प आम्ही पूर्ण करण्यास प्राधान्य दिले आहे. येत्या तीन वर्षात हे सर्व प्रकल्प पूर्ण होणार आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन

By

Published : Sep 12, 2019, 9:32 AM IST

जळगाव - राज्यातील मोठ्या धरणांमध्ये असलेला गाळ व वाळुमुळे पाण्याचा साठा मर्यादित झाला आहे. त्यामुळे मोठ्या धरणांमधील गाळ तसेच वाळू काढण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. धरणांमधील गाळ काढणे, त्याचबरोबर नदीजोड प्रकल्प राबवून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणे, हा आमच्या सरकारचा यापुढचा फ्लॅगशिप प्रोग्राम असणार आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे दिली. अजिंठा शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ उपस्थित होते.

राज्यातील मोठ्या धरणांमधील गाळ काढणार - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

हेही वाचा -राज्यात नव्या मोटार वाहन कायद्याला स्थगिती; पुनर्विचाराची मागणी

यावेळी महाजन यांनी पुढे सांगितले की, राज्यात आजपर्यंत जितका निधी सिंचनासाठी व प्रकल्पांसाठी आलेला नाही तितका निधी या पाच वर्षात आला आहे. गेल्या दहा वर्षात काँग्रेस व राष्ट्रवादीतील भानगडींमुळे राज्यातील अपूर्ण प्रकल्पांसाठी सुधारित निधीला मान्यता देण्यात आली नव्हती. मात्र, भाजप सरकारने राज्यातील रखडलेल्या सर्व प्रकल्पांसाठी सुधारित निधी मंजूर केला. आम्ही एकही नवा प्रकल्प हाती घेतला नाही. ८० ते ८५ टक्के काम झालेले मात्र, रखडलेले प्रकल्प आम्ही पूर्ण करण्यास प्राधान्य दिले आहे. येत्या तीन वर्षात हे सर्व प्रकल्प पूर्ण होणार आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा -राज ठाकरे 'ईडी'च्या चौकशीनंतर गप्प झालेत - अजित पवार

सरकारला वाढीव उत्पन्न मिळणार -

राज्यातील मोठ्या धरणांमध्ये गाळ व वाळुचे प्रमाण जास्त असल्याने पाण्याचा साठा कमी होत आहे. त्यामुळे या धरणांमधील गाळ व वाळू काढण्यासाठी लवकरच नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. काही तांत्रिक कारणांमुळे आधी निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. मात्र, ती नव्याने राबवली जाईल. विशेष म्हणजे, या कामासाठी सरकारला कोणत्याही प्रकारचा खर्च येणार नाही. उलट वाळुच्या विक्रीतून रॉयल्टीमधून उत्पन्न मिळणार आहे. त्याचप्रमाणे वाळू काढलेला गाळ शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत दिला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत नाशिकमध्ये 'महाजनादेश' यात्रेचा समारोप

नदीजोड प्रकल्पाला प्राधान्य -

राज्यातील मोठ्या नद्यांमधून समुद्रात वाहून जाणारे पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून दुष्काळी भागात वळवण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. विदर्भ, मराठवाडा तसेच खान्देश या दुष्काळी भागात नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी आणले जाणार आहे. अतिविपूल खोऱ्यातून पाणी वळवण्यासाठी योजना आखल्या जात आहेत. यातून पूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही महाजन म्हणाले.

मित्र पक्षांना १८ ते २० जागा सोडणार -

भाजप-सेना युतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. लवकरच ती पूर्ण होईल. पण राज्यात भाजपचे विद्यमान आमदार असलेल्या जागा अपवाद वगळता भाजपकडेच राहणार आहेत. मित्रपक्षांच्या १८ ते २० जागा सोडून उर्वरित जागांच्या वाटपावर युतीमध्ये चर्चा सुरु आहे, असेही यावेळी महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा -भाजप आमदार संगीता ठोंबरेंसह पती विजयप्रकाश यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश

जुन्या लोकांवर अन्याय होण्याचा प्रश्नच -

खान्देशात पुन्हा मेगा भरती आहे का? या प्रश्नावर महाजन यांनी स्पष्टीकरण दिले. आता आमच्याकडे हाऊस फुल्ल झाल्याने खान्देशातील मेगा भरती बंद करण्यात आली आहे. मेगा भरती करुन बाहेरुन उमेदवार घेत असल्याने भाजपतील जुन्या लोकांवर अन्याय होतोय का? असे विचारले असता, आम्ही केवळ ज्या ठिकाणी भाजपची ताकद कमी आहे. त्याच ठिकाणी बाहेरुन चांगली माणसे आम्ही घेत आहोत. त्यामुळे जुन्या लोकांवर अन्याय होण्याचा प्रश्नच नसल्याचे महाजन म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details