महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 26, 2021, 6:25 PM IST

Updated : Feb 26, 2021, 6:57 PM IST

ETV Bharat / state

शिवसेना, एमआयएमचा विरोध झुगारून हद्दवाढीचा विषय मंजूर

शिवसेनेचा आणि एमआयएमचा विरोध झुगारून हद्दवाढीचा विषय मंजूर करण्यात आला आहे. शहरालगत असलेल्या आव्हाणे, कुसूंबा, मोहाडी, सावखेडा व मन्यारखेडा या पाच गावांचा समावेश मनपा हद्दीत करण्याचा ठराव शुक्रवारी बहूमताने मंजूर करून घेतला आहे.

While Shiv Sena and MIM were opposed, the extension of Jalgaon city was approved
शिवसेना, एमआयएमचा विरोध झुगारून हद्दवाढीचा विषय मंजूर

जळगाव -शहरातील नागरिकांना कराची रक्कम भरल्यावर देखील मुलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. जळगावकरांना रस्ते, गटारी, स्वच्छता, आरोग्याचा प्रश्नांना सामोरे जावे लागत असताना, मनपातील सत्ताधारी भाजपने जळगाव शहरालगत असलेल्या आव्हाणे, कुसूंबा, मोहाडी, सावखेडा व मन्यारखेडा या पाच गावांचा समावेश मनपा हद्दीत करण्याचा ठराव शुक्रवारी बहूमताने मंजूर करून घेतला आहे. या ठरावाला शिवसेना व एमआयएमच्या नगरसेवकांनी विरोध केला आहे. एकीकडे जळगावकरांना सुविधा मिळत नसताना, दुसरीकडे अशा प्रकारचा अव्यवहार्य असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी केला आहे.

शिवसेना, एमआयएमचा विरोध झुगारून हद्दवाढीचा विषय मंजूर

महापालिकेच्या दोन विशेष महासभा शुक्रवारी महापौर भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडल्या. यावेळी उपमहापौर सुनील खडके, आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते. दोन्ही महासभेत एकूण ८५ विषय मंजूरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यात ७५ विषयांना महासभेने मंजुरी दिली. दोन विषय तहकूब करण्यात आले. ७ विषय नामंजूर करण्यात आले. स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी मनपाची हद्दवाढ करण्याचा प्रस्तावावरून महासभेत चांगलाच गोंधळ झाला. शिवसेनेने या प्रस्तावाला विरोध केला, तर सत्ताधारी भाजपने हा विषय विरोधानंतरही मंजुर करून घेतला.

गावांमध्ये सुविधा मिळत नसल्याने हद्दवाढ करा -

भाजपच्या राजेंद्र घुगे-पाटील, चेतन सनकत, कुलभुषण पाटील, नवनाथ दारकुंडे व प्रतीभा कापसे या पाच नगरसेवकांनी शहरालगत असलेली पाच गावे महापालिका हद्दीत समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवला होता. या प्रस्तावाला भाजपने बहूमताने मंजुरी दिली. तसेच मंजूरी देताना शहराची हद्दवाढ झाल्यास शहरालगत असलेल्या गावांमध्ये चांगल्या सुविधा देण्यात येतील व महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत देखील वाढतील असे मत राजेंद्र घुगे-पाटील यांनी व्यक्त केले.

जळगावकरांना सुविधा देण्यास बोंब, गावातील नागरिकांना काय देणार -

शहराची हद्दवाढ ही दशकानंतर केली जाते. मात्र, जर महापालिका शहरातील नागरिकांना सुविधा देण्यास सक्षम नसेल तर ही हद्दवाढ करून काय फायदा ? असा प्रश्न नितीन लढ्ढा यांनी उपस्थित केला. एकीकडे जळगावकरांना सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. अशा परिस्थितीत ज्या गावांना ग्राम पंचायतीमार्फत चांगल्या सुविधा मिळत आहेत. त्या सुविधा देखील मिळणार नाहीत, असे सांगत सत्ताधाऱ्यांचा प्रस्तावाला विरोध केला. तसेच हा प्रस्तावच मुळात चुकीचा असून, अशा प्रकारचे प्रस्ताव आणण्यामागे काय उदिष्ट आहे ? असा प्रश्नही लढ्ढा यांनी उपस्थित केला.

सेना, एमआयएमचा विरोधानंतरही ठरावाला मंजुरी -

हद्दवाढीचा प्रस्तावाला शिवसेना व एमआयएमच्या सदस्यांनी विरोध केला. मात्र, सत्ताधारी भाजपने हा प्रस्ताव बहूमताने मंजूर करून घेतला. महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असून, नगरविकास मंत्रालयाकडून याबाबत अंतीम निर्णय घेण्यात येणार आहे.

पुढील राजकीय पुर्नवसनासाठीचा घेतलेला निर्णय -

गेल्या काही महिन्यांपासून जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे दोन मतदार संघ तयार होणार असल्याची राजकीय चर्चा सुरु आहेत. जळगाव पुर्व व जळगाव पश्चिम मध्ये हे दोन मतदारसंघ विभागले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्याचदृष्टीने पुढील राजकीय पुर्नवसन करण्यासाठी हा प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Last Updated : Feb 26, 2021, 6:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details