जळगाव - सुप्रीम काॅलनी भागातील पाेलीस काॅलनी परिसरातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या १२ दिवसापासून महापालिकेकडून या परिसरात पुरवठा करण्यात आलेला नाही. वास्तविक या भागातील नागरिकांकडून देखील पाणीपट्टीचे २ हजार रूपये आकारले जातात. परंतु, ३६५ दिवसात केवळ ४० दिवसच पुरवठा केला जात असल्याची ओरड सुरू आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांकडून अनेक वेळा पाहणी झाली. परंतु, पाणी प्रश्न काही सुटलेला नाही.
गेल्या २३ मे पासून आतापर्यंत पाेलीस काॅलनी परिसरात अद्यापही पाणीपुरवठा झालेला नाही. उन्हाळ्यात या परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा प्रचंड सामना करावा लागत आहे. शहरात आठवडाभरात 2 वेळा पाणीपुरवठा केला जाताे. परंतु, सुप्रीम काॅलनी परिसरात मात्र एकदाही पुरवठा हाेत नसल्याची नागरिकांची व्यथा आहे.