जळगाव - शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. भटकी कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, लचके तोडणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, शहरातील वाघनगर परिसरात एका कुत्र्याने 10 बालकांचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महापालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
शहरातील वाघनगर परिसरातील ओम साईराम नगरात ही घटना घडली आहे. एका कुत्र्याने तब्बल 10 बालकांचे लचके तोडले. या घटनेत जखमी झालेली सर्वच बालके ही 3 ते 11 वर्षे वयोगटातील आहेत. त्यात 3 बालकांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमी झालेल्या बालकांवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाघनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात असताना महापालिका प्रशासन मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
3 बालकांना गंभीर दुखापत -