महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्याने गमावला अजून एक सुपुत्र; तांबोळे बुद्रुकच्या जवानाला वीरमरण - जळगावमधील जवान शहीद

सागर हे चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रुक येथील रहिवासी होते. ते नोव्हेंबर 2017 मध्ये 5, मराठा इन्फन्ट्री बटालियनमध्ये रुजू झाले होते. त्यानंतर ते सध्या मणिपूर याठिकाणी सेवारत होते. आज, 31 जानेवारी रोजी त्यांना वीरमरण आले.

जळगाव
जळगाव

By

Published : Jan 31, 2021, 5:24 PM IST

जळगाव- जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रुक येथील एका जवानाला आज (31 जानेवारी रोजी) मणिपूरमधील सेनापती येथे वीरमरण आले आहे. सागर रामा धनगर असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, सागर यांना वीरमरण कसे आले, काय घटना घडली? याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.

3 वर्षांपूर्वी सैन्यात झाले होते रुजू-

सागर हे चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रुक येथील रहिवासी होते. ते नोव्हेंबर 2017 मध्ये 5, मराठा इन्फन्ट्री बटालियनमध्ये रुजू झाले होते. त्यानंतर ते सध्या मणिपूर याठिकाणी सेवारत होते. आज, 31 जानेवारी रोजी त्यांना वीरमरण आले.

जळगाव

2 फेब्रुवारीला पार्थिव मूळगावी येण्याची शक्यता-
वीरजवान सागर यांचे पार्थिव 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता मणिपूरच्या इम्फाळ येथून आसामच्या गुवाहाटीत आणले जाणार आहे. त्यानंतर पार्थिव मुंबईत विमानतळावर आणले जाईल. त्यानंतर सैन्य दलाच्या नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सागर यांचे पार्थिव 2 फेब्रुवारी रोजी त्यांच्या मूळगावी तांबोळे बुद्रुक येथे आणले जाईल, अशी शक्यता आहे.
चाळीसगाव तालुक्यातील तिसऱ्या जवानाला आले वीरमरण-
गेल्या 2 महिन्यांच्या काळात चाळीसगाव तालुक्यातील तिसऱ्या जवानाला वीरमरण आले आहे. यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना यश दिगंबर देशमुख हे शहीद झाले होते. देशमुख हे चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवासी होते. त्यानंतर चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील जवान अमित साहेबराव पाटील यांचे कर्तव्यावर असताना अपघाती निधन झाले होते. त्यांच्या अंगावर बर्फाची लादी पडून ते गंभीर जखमी झाले होते. आता पुन्हा याच तालुक्यातील सागर यांना वीरमरण आले असून, जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details