महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावातील व्यापारी संकुलातील दुकाने आठवड्यातून फक्त चार दिवस राहणार सुरू - central fule market association jagaon news

सोमवारी जिल्हा प्रशासनाने व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यामध्ये शहरातील प्रमुख व्यापारी संकुलातील दुकाने आठवड्यातून फक्त 4 दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तर, 5 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

जळगाव व्यापारी संकुल बातमी
जळगाव व्यापारी संकुल बातमी

By

Published : Aug 3, 2020, 10:10 PM IST

जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख व्यापारी संकुलातील दुकाने आठवड्यातून फक्त 4 दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आणि प्रशासनात सोमवारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला असून, 5 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आता जळगाव शहरातील व्यापारी संकुलातील दुकाने रविवार, सोमवार, बुधवार व शुक्रवार असे चारच दिवस सुरू असणार आहेत. तर मंगळवार, गुरुवार व शनिवारी दुकाने बंद राहतील.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. त्यातल्या त्यात जळगाव शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याने जिल्हा प्रशासनाने जळगावातील व्यापारी संकुले बंद ठेवली होती. मात्र, 4 महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने व्यापारीवर्ग हवालदिल झाला आहे. नियमांच्या चौकटीत दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी म्हणून, व्यापारी आग्रही होते. ही बाब लक्षात घेऊन, सोमवारी जिल्हा प्रशासनाने व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. बैठकीस आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासोबत सेंट्रल फुले मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मतानी, गोलाणी मार्केट व इतर मार्केटचे पदाधिकारी उपस्थित होते.

सम-विषम तारखांवर व्यापाऱ्यांचा आक्षेप :

आयुक्त कुलकर्णी यांनी शासनाच्या व्यापारी संकुले सुरू करण्याबाबत नियमांची माहिती दिली. त्यानुसार सम व विषम तारखांना व्यापारी संकुलातील दुकाने सुरू ठेवता येतील, असे सांगितले. त्यावर व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतला. सम-विषम तारखांना दुकाने सुरू ठेवताना अडचणी येतील. सर्वच दुकाने खुले नसल्याने ग्राहकांना एकाचवेळी सर्व वस्तूंची खरेदी करता येणार नाही, यासह विविध कारणे सांगण्यात आली. त्यावर आमदार भोळे यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त व्यापाऱ्यांचा हिताचा निर्णय घेत आहेत. यामुळे गर्दी कमी होऊन कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी असेल असे सांगितले. व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण न होण्यासाठी हा निर्णय असल्याचे सांगण्यात आले. मात्र, व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवण्याची वेळ कमी करा मात्र, सर्व दुकाने सुरू करू द्या, अशी आग्रही मागणी केली. यावर सुरुवातीला व्यापारी संकुले सुरू होऊ द्या, गर्दीची स्थिती लक्षात घेऊन पुढे सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details