महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 7, 2020, 4:20 PM IST

ETV Bharat / state

जळगावात कापसाच्या लागवडीसाठी शेतकरी सज्ज, १५ लाख कापूस बियाणे पाकिटांची विक्री

जळगाव जिल्ह्यात शेतकरी कापूस लागवडीकरता सज्ज झाले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांकडून १५ लाख पाकिटांची खरेदी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. तर, उर्वरित बियाणे २५ जूनपर्यंत विक्री होईल, असा अंदाज विक्रेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

१५ लाख कापूस बियाणे पाकिटांची झाली विक्री
१५ लाख कापूस बियाणे पाकिटांची झाली विक्री

जळगावात कापूस बियाणे पाकिटांची विक्री

जळगाव -जिल्ह्यात जवळपास ५ लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र अपेक्षित असलेल्या कापसाच्या लागवडीसाठी शेतकरी सज्ज झाले असून, बदलत्या वातावरणामुळे कापसाच्या बिटी बियाणांची विक्री वाढली आहे. २५ मेपासून ६ जूनपर्यंत जिल्ह्यात जवळपास १५ लाख बियाण्यांची पाकिटे विक्री झाल्याचा अंदाज आहे. जिल्ह्याची गरज २२ ते २४ लाख पाकिटांची असून, उर्वरित बियाणे २५ जूनपर्यंत विक्री होईल, असा अंदाज विक्रेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

जळगाव जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र ५ लाख हेक्टरपर्यंत असून, यापैकी साडेचार लाख हेक्टरवर बिटी कापसाची लागवड होत असते. लागवड अधिक असल्याने जिल्ह्यातील बियाणे कंपन्यांचे मार्केटदेखील मोठे आहे. २२ ते २४ लाख बिटी बियाण्याच्या पाकिटांची गरज असून, त्यापेक्षा अधिक पाकिटे जिल्ह्यात दाखल झाली आहेत.

जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांकडून १५ लाख पाकिटांची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आली आहे. १ जूनपासून वातावरण बदलले असून, पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनचे आगमन वेळेत होणार असल्याची शक्यता गृहीत धरून शेतकरी बियाणे खरेदीला गर्दी करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बियाणे बाजार तेजीत आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details