जळगाव -शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, जिल्हा प्रशासनाकडून लग्नसोहळ्याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मात्र, असे असताना देखील शहरात नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरातील योगेश्वरनगरात एका लग्न सोहळ्यात 100 हून अधिक वऱ्हाडी आढळून आल्याने महापालिका उपायुक्तांच्या पथकाने वधूवर पित्यांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
100 पेक्षा अधिक वऱ्हाडी
शहरातील योगेश्वरनगरात एका लग्नसमारंभात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार महापालिका प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह कर्मचाऱ्यांचे पथक लग्नसमारंभ असलेल्या ठिकाणी पोहचले. त्यावेळी कुठेही फिजिकल डिस्टन्सिंग दिसून आले नाही. विशेष म्हणजे लग्नाला आता केवळ 25 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असताना तेथे 100 पेक्षा अधिक वऱ्हाडी आढळून आले. काहींच्या तोंडावर मास्क नव्हते. सॅनिटायझेशनची कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. त्यामुळे उपायुक्तांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 50 हजारांचा दंड केला.
समाजभान जपण्याची गरज