महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात शासकीय कापूस खरेदी केंद्रांची प्रतीक्षा; खासगी व्यापाऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल - Farmers hail from private traders jalgaon

जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी होते. यात सर्वाधिक पाच ते साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र हे जिरायती तसेच बागायती कापसाचे असते. यावर्षी ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस या पिकांना मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडून हवालदिल झाला आहे. शेतीला लागलेला खर्चही निघालेला नाही. सुरुवातीला कडधान्य पिके शेतकऱ्यांच्या हातून निघून गेली. त्यानंतर शेतकऱ्यांची सर्व मदार नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कापसावर अवलंबून होती.

Waiting for Government Cotton Shopping Centers

By

Published : Nov 10, 2019, 7:54 PM IST

जळगाव -जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नगदी पीक समजल्या जाणाऱ्या बागायती कापसाला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला. पावसामुळे कापूस ओला झाल्याने त्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. प्रतवारी घसरलेल्या कापसाला बाजारात कमी भाव मिळत आहे. खासगी व्यापारी कमी दरात कापूस खरेदी करीत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने कापूस खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

जळगावात शासकीय कापूस खरेदी केंद्रांची प्रतीक्षा

जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी होते. यात सर्वाधिक पाच ते साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र हे जिरायती तसेच बागायती कापसाचे असते. यावर्षी ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस या पिकांना मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडून हवालदिल झाला आहे. शेतीला लागलेला खर्चही निघालेला नाही. सुरुवातीला कडधान्य पिके शेतकऱ्यांच्या हातून निघून गेली. त्यानंतर शेतकऱ्यांची सर्व मदार नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कापसावर अवलंबून होती. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतातील कापूस खराब झाला आहे. खराब झालेला कापूस खासगी व्यापारी कवडीमोल दरात खरेदी करत आहेत. शासनाची कापूस खरेदी केंद्र अद्याप सुरू नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने मिळेल त्या दरात खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. सरकारने कापसाला ठोस हमीभाव जाहीर करून कापूस खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावीत, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

हेही वाचा -पोलीस आणि न्याय विभागात महाराष्ट्र चौथा; तुरुंग विभागात दुसऱ्या क्रमांकावर

सरकारची कापूस खरेदी केंद्र सुरू नसल्याने इच्छा नसूनही शेतकऱ्यांना आपला माल खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे कापसाच्या प्रतवारीवर परिणाम झाल्याने खासगी व्यापारी कमी दरात कापूस खरेदी करत आहेत. जिल्ह्यात बहुसंख्य जिनिंग आणि प्रेसिंग कारखान्यात कापसाला 4 हजारांपासून ते 5 हजारांपर्यंतचा दर प्रतिक्विंटल कापसाला दिला जात आहे. ऑक्टोबर महिन्यात पावसापूर्वी वेचणी झालेल्या दर्जेदार पूर्वहंगामी कापसाला 5 हजार ते 5200 रुपये पर्यंतचा प्रतिक्विंटल दर मिळत आहे. मात्र, त्यानंतर वेचणी झालेल्या कापसाची प्रतवारी खराब असल्याने जास्तीचा दर शक्य नसल्याचे व्यापारीवर्गाचे म्हणणे आहे.

हेही वाचा -संगमनेरच्या जवानाचा अपघाती मृत्‍यू; दिवाळी सुट्टीसाठी आल्यावर घडली घटना

जिल्ह्यातील शेतकरी गेल्या 4 ते 5 वर्षांपासून कोरड्या दुष्काळाला सामोरे जात होता. यावर्षी जुलैपासून वेळोवेळी चांगला पाऊस झाल्याने हंगाम जोरात होता. उत्पन्न चांगले येईल, या अपेक्षेने शेतकरीवर्ग देखील समाधानी होता. मात्र, ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. शेतीत टाकलेला खर्चही निघालेला नाही. नुकसान भरपाई देखील अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने किमान कापसाच्या हमीभावाच्या बाबतीत तरी तत्काळ निर्णय घ्यावा, ही अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा -मनमाडजवळ एसटी बसला अपघात; 18 प्रवासी जखमी

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details