महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोनाला खुलेआम निमंत्रण! उसळली गर्दी

जिल्ह्यासह परजिल्ह्यातील व्यापारी व शेतकरी शेतीमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी येत असतात. अशा परिस्थितीत एखादा कोरोनाबाधित व्यक्ती त्या ठिकाणी दाखल झालेला असेल तर एकाच वेळी शेकडो जणांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, हेच शेतकरी, व्यापारी जळगावातून कोरोनाचा प्रसार बाहेर देखील करू शकतात. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनासह महापालिकेने धडक कारवाई करण्याची गरज आहे.

By

Published : May 10, 2021, 11:13 AM IST

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

जळगाव -जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कायम आहे. दररोज शेकडोंच्या संख्येने कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत असून, मृत्यूचे आकडेही भयावह आहेत. एवढी विपरीत परिस्थिती असताना जळगावकर मात्र, स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत कमालीचे बेफिकीर असल्याचे पाहायला मिळत आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज पहाटेच्या वेळी होणाऱ्या भाजीपाला व फळांच्या लिलावावेळी हजारोंच्या संख्येने गर्दी उसळत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दी

कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारीच नाही तर शेतकरी आणि किरकोळ ग्राहकांना देखील फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, निर्जंतुकीकरण अशा खबरदारीच्या उपाययोजनांचे गांभीर्य नसल्याने कोरोनाला खुलेआम निमंत्रण मिळत आहे. याठिकाणी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील व्यापारी व शेतकरी शेतीमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी येत असतात. अशा परिस्थितीत एखादा कोरोनाबाधित व्यक्ती त्या ठिकाणी दाखल झालेला असेल तर एकाच वेळी शेकडो जणांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, हेच शेतकरी, व्यापारी जळगावातून कोरोनाचा प्रसार बाहेर देखील करू शकतात. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनासह महापालिकेने धडक कारवाई करण्याची गरज आहे.

बाजार समितीत कोरोनाला खुलेआम निमंत्रण! उसळली गर्दी

हजारोंच्या संख्येने उसळतेय गर्दी-
जळगाव शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित फळे व भाजीपाला मार्केट आहे. याठिकाणी दररोज पहाटे 5 वाजेपासून शेतीमालाचा जाहीर लिलाव केला जातो. या मार्केटमध्ये दीडशेहून अधिक नोंदणीकृत व्यापारी आणि आडते आहेत. जळगावसह राज्यातील इतर जिल्हे आणि परराज्यातून याठिकाणी फळे तसेच भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते. पहाटे 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत लिलाव सुरू असतो. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना मार्केटमध्ये दररोज शेतकरी, व्यापारी, आडते तसेच माल घेणारे किरकोळ विक्रेते यांची हजारोंच्या संख्येने गर्दी उसळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होते. अनेक व्यापारी तसेच ग्राहक तोंडावर मास्क देखील बांधत नाहीत. मालाचा लिलाव करताना व्यापारी आणि शेतकरी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखत नाहीत.
बाजार समिती प्रशासन हतबल-
फळे व भाजीपाला मार्केटमध्ये दररोज उसळणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाचे म्हणणे आहे. शेतीमाल हा नाशवंत असल्याने कमी वेळेत लिलाव आटोपता घ्यावा लागतो. त्यामुळे गर्दी उसळते, असे बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details