जळगाव -भाजपचे माजी खासदार तथा विद्यमान जिल्हाध्यक्ष हरिभाऊ माधव जावळे यांचे आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुंबईत निधन झाले. मृत्यूसमयी ते 67 वर्षांचे होते. प्रकृती खालावल्याने त्यांना ५ जूनला मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ हलविण्यात आले होते. त्यादरम्यान आज (मंगळवारी) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, कल्पना, मुलगा अमोल, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
हरिभाऊ जावळे यांचा जन्म यावल तालुक्यातील भालोद येथे ३ ऑक्टोबर १९५३ रोजी झाला होता. ते विज्ञान पदवीधर होते. ते पूर्वी जनसंघात सक्रिय होते. सन १९९९ ते २००४ मध्ये यावल विधानसभा मतदारसंघाचे एक वेळा त्यांनी प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर २००७ मध्ये झालेल्या तत्कालीन जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत तसेच २००९ मध्ये १५ व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून गेले होते. या काळात सलग दोन वेळा त्यांनी लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर पुन्हा त्यांनी २०१४ मध्ये यावल-रावेर मतदारसंघातून विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांचे नाव जाहीर केले होते. पण ऐनवेळी त्यांच्याऐवजी भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसेंना संधी देण्यात आली होती. लोकसभेचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने त्यांना आमदारकीची संधी दिली होती. तेव्हा त्यांनी काँग्रेसचे शिरीष चौधरी यांचा १० हजार मतांनी पराभव केला होता. दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र, याच शिरीष चौधरी यांनी हरिभाऊ जावळे यांचा पराभव केला होता. त्यानंतर सध्या त्यांच्यावर पक्षाने जळगाव जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली होती.
सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य-