जळगाव- महापालिका व मुक्ताईनगर नगरपंचायतीचे काही भाजप नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. भाजपला लागलेल्या गळतीवर गिरीश महाजन यांनी मौन सोडत पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. 'राहिले ते मावळे, उडाले ते कावळे. महाविकास आघाडीची सत्ता येताच मंत्री व नेत्यांकडून नगरसेवकांना आमिष देऊन, दबावतंत्राचा वापर करत पक्षांतर करण्यास भाग पाडले जात आहे', असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारच्या विरोधात भाजपच्या वतीने गुरुवारी आक्रोश आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यातील खडसे यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीबद्दलही भूमिका मांडली.
'ती' भेट फक्त म्हणजे औपचारिकता