महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत वाघाच्या दहशतीने भीतीचे वातावरण; पंजाचे ठसे पाहून शोध सुरू - वाघ हल्ला हिंगोली

वाघाने गेल्या ३ दिवसात सुकळी येथील ५ शेतकऱ्यांवर तर मन्नास पिंपरी परिसरातील एका हरणारावर हल्ला केला आहे. यामुळे आधीच पाण्याने त्रासलेल्या नागरिकांचा जीव वाघाच्या दहशतीने वेठीस आला आहे.

वाघाच्या दहशतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By

Published : Nov 3, 2019, 11:59 AM IST

हिंगोली - जिल्ह्यात १० दिवसांपासून पावसाचा कहर सुरूच आहे तर ३ दिवसांपासून वाघाच्या दहशतीने गावकऱ्यांचा जीव वेठीस आला आहे. या दोन्ही संकटाने जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः भयभीत झाले आहेत. जनावरांवर हल्ला करणारा वाघ आता थेट माणसांवर हल्ला करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत वाढली आहे. या वाघाने सुकळी येथील ५ शेतकऱ्यांवर तर मन्नास पिंपरी परिसरातील एका हरणारावर हल्ला केला आहे. वनविभाग या वाघाच्या लहान सहान हालचालीवर लक्ष ठेवून असले तरी अजूनपर्यंत वाघाला ताब्यात घेण्यात आलेले नाही. मात्र, पहिल्यांदाच जिल्ह्यात आलेल्या वाघामुळे वनविभागासह नागरिकांची झोप उडाली आहे.

वाघाच्या दहशतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जिल्ह्यात रात्री अपरात्री पाऊस हजेरी लावत असून दिवसा उघडीप देत आहे. त्यामुळे शेतकरी जमेल तशी भिजलेली सोयाबीन वाळवून टाकण्याचा प्रयत्न करीत असून पशुपालक आपली जनावरे नेहमीप्रमाणे जंगल परिसरात चरण्यासाठी नेत आहेत. मात्र गेल्या ३ दिवसांपासून दाखल झालेल्या वाघामुळे शेतकऱ्यांचे नियोजनच बिघडल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आल्याने बळीराजावर मोठे संकट ओढावले आहे. या दोन्हींचा सामना करता-करता जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

हेही वाचा -'त्या' तरुणीचा खून गळा आवळून, ओळख पटली

पहिल्यांदाच हिंगोलीत दाखल झालेल्या वाघाच्या पाठीमागे वनविभागाचे कर्मचारी हात धुवून लागले आहेत. मात्र, ३ दिवस उलटून गेले असले तरी अजून वाघावर ताबा मिळविण्यात वनविभागाला यश आले नाही. हा वाघ दिवसेंदिवस आक्रमक होत चालला असून, आधी तो जनावरांवर हल्ला करायचा. मात्र, आता त्याने माणसांवर हल्ला करण्यास सुरुवात केल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या वाघाला शोधण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत ग्रामस्थ ही सरसावले आहेत. मात्र, हा वाघ दिवसेंदिवस जागा बदलत असल्यामुळे त्या त्या भागातील शेतकऱ्यांची चिंताही वाढत चालली आहे. यामुळे शेतावरील गुरे असुरक्षित आहेतच मात्र, त्याबरोबर गावात गोठ्यात बांधलेली जनावरेही असुरक्षित असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या प्रकरणी वनविभागाने तत्काळ या वाघाला ताब्यात घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा - निम्म्याहून अधिक भरलेल्या परभणीच्या येलदरी धरणाला गळती; परिसरात भीतीचे वातावरण

ABOUT THE AUTHOR

...view details