हिंगोली- विजयी उमेदवार हेमंत पाटील यांनी हिंगोलीच्या जनतेचे आभार मानले आहेत. हा माझा विजय नसून हा माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे. या हिंगोली लोकसभा मतदार संघातील मतदारांने बेईमानाला झिडकारून सत्याचा विजय केला आहे. जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासास अजिबात तडा जाऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटले.
मतदारांनी बेईमानाला झिडकारून सत्याचा विजय केला - हेमंत पाटील - hingoi
हिंगोली लोकसभा मतदार संघातील मतदारांने बेईमानाला झिडकारून सत्याचा विजय केला आहे. जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासास अजिबात तडा जाऊ देणार नाही, असे हेमंत पाटील यांनी म्हटले.

विजयी उमेदवार हेमंत पाटील
या मतदार संघातील मतदारांचा विकास निश्चित करणार आहे. या जिल्ह्याच्या सोडवण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेल. हिंगोली जिल्ह्यात मुख्य असलेला पाणी सिंचन प्रश्न मार्गी लावून औधोगिक वसाहतीत ही विकास करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी प्रश्न तर सुटेलच त्याहूनही हिंगोलीत रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी म्हटले.
विजयी उमेदवार हेमंत पाटील
हेमंत पाटील यांच्या विजयाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मतमोजणी केंद्र परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते थांबले होते. सुरुवातीपासून हेमंत पाटील हे आघाडीवर होते.