हिंगोली -एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे ( Maharashtra ST Worker Strike ) राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून, त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. यातून 63 एसटी कर्मचाऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackarey ) यांच्याकडे कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर ( MLA Santosh Bangar Wrote Letter To CM ) यांनी केली आहे. शिवसेनेच्या आमदारांनीच सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
आमदार बांगर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी -
मागील दोन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभर संप सुरू आहे या संपावर अजून तरी सरकारने कोणताही तोडगा काढला नाही, अशातच तुटपुंज्या पगारीमुळे आतापर्यंत 63 कर्मचाऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. एवढी भयंकर परिस्थिती असून कर्मचाऱ्यांच्या मागण्याचा अजिबात विचार सरकारने केलेला नाही. त्यामुळे हिंगोलीतील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे इच्छा मरणाची मागणी केली आहे. मागणीसाठी सैरभैर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांची दया आलेल्या कळमनुरी विधानसभेच्या शिवसेना आमदारांनी यात धाव घेऊन सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. आमदार बांगर यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून, त्यांच्या मागण्यांचा सहानुभूती पूर्वक विचार करावा, अशी मागणीच थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
सोशल मीडियावर पत्र व्हायरल -