महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन दिवसाच्या प्रतीक्षेनंतर हिंगोलीत पावसाची जोरदार हजेरी; पेरणीची लगभग सुरु

मागील पाच ते सात दिवसापासून अधून मधून जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही प्रमाणात शेतकरी पेरणी करून घेत आहेत. मंगळवारी झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, पेरणीला गती येण्याचे चित्र आहे.

By

Published : Jul 2, 2019, 7:50 PM IST

पेरणीची लगभग सुरु

हिंगोली - जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करत होता. मागील पाच ते सात दिवसांपासून अधून मधून जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही प्रमाणात शेतकरी पेरणी करून घेत आहेत. मंगळवारी झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, पेरणीला गती येण्याचे चित्र आहे.

पेरणीची लगभग सुरु

यंदा पावसाअभावी अद्याप केवळ 10 टक्केच पेरणी झाली. मागीलवर्षी निम्मी पेरणी आटोपली होती. यावर्षीचे चित्र उलट आहे. ज्या शेतकऱ्यांकडे भविष्यात पाण्याची व्यवस्था आहे असे शेतकरी हळदीची लागवड करीत आहेत. मागील तीन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने शेतकरी चिंतातूर आहे. याही वर्षी मागील वर्षी सारखीच परिस्थिती असल्याने, खरिपाची पेरणी लांबणीवर गेली आहे. तसेच मृगनक्षत्र पूर्णता कोरडे गेल्याने डाळवर्गीय पिकाची पेरणी करणे शक्य नाही.

मंगळवारी दुपारी 12.10 वाजताच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग दहा मिनिटे सारखाच पाऊस सुरू होता. नंतर काही वेळाने पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यांवर व शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. दिवसभर सुरू असलेल्या पावसाने हिंगोली जिल्ह्यातील विविध भागातील नदी नाले दुथडी भरून वाहत होते. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.

सेनगाव तालुक्यातील अनेक गावातील नदी - नाल्या लगतची शेती खरडून गेली आहे. तर काही शेतकऱ्यांच्या शेतीतील गाळ वाहून गेल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले. एकीकडे पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा अन दुसरीकडे मात्र, त्याच पावसाने सर्व शेती खरडून नेली आहे. त्यामुळे पेरणी पूर्ण होण्याअगोदरच शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

खरिपाच्या पेरणीसाठी हिंगोली जिल्ह्यात 226.85 मिमी पावसाची अपेक्षा होती. परंतु, अद्यापपर्यंत केवळ 67.37 मीटर सरासरी पावसाचीच नोंद झाली. तर रविवारी केवळ 0.92 टक्के पाऊस झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. मागील वर्षी 1 जून ते 1 जुलै पर्यंत हिंगोली जिल्ह्यात 242.42 मि.मि पाऊस पडला होता. यंदा तर केवळ या महिनाभराच्या कालावधीत केवळ 68. 30 मि.मि पाऊस झाला आहे. अजूनही जिल्ह्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना अजूनही जोरदार पावसाची अपेक्षा आहे. काही गावातील शेतकऱ्यांनी तर पावसाअभावी शेतीची नांगरणी देखील केली नसल्याचे चित्र दिसून येते. शिवाय खते बी-बियाणे खरेदी करण्यासाठीही पाठ फिरवली आहे. त्यामुळे कृषी केंद्र चालकांना शेतकऱ्याची प्रतीक्षा लागली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details