महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 30, 2019, 9:03 PM IST

ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात सहाव्या दिवशीही पावसाची संततधार कायम

हिंगोली जिल्ह्यात सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावासामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र या पावसामुळे जिल्ह्यात नव्याने बनवण्यात येत असलेल्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात सहाव्या दिवशीही पावसाची संततधार कायम

हिंगोली - जिल्ह्यात पाच ते सहा दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. मागील सहा दिवस सुरू असलेल्या पावासामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र या पावसामुळे जिल्ह्यात नव्याने बनवण्यात येत असलेल्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. तर ज्या भागात रस्तेच नाहीत अशा भागात वाहनचालकांना रस्ता पार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

हिंगोली जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशीही पावसाची संततधार सुरू आहे
हिंगोली जिल्ह्यात सलग सहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. जंगलातील नदी नाले वाहण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यास मदत झाली आहे. यंदा मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. पाऊस लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्या देखील लांबणीवर गेल्या होत्या. मात्र उशिरा का होईना हजेरी लावलेल्या या पावसामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे. सुरू असलेल्या संततधार पावसामुळे काही काळ त्रास होणार आहे. मात्र भविष्यात हा पाऊस खरिपाच्या पिकाची वाढ पूर्ण होण्यासाठी लाभदायी ठरणार असल्याच्या, प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details