हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील लसीना येथील मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता होता. याबद्दलची तक्रार कळमनुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी शोध सुरू केला असता यवतमाळच्या शेंबाळपिंपरी परिसरात या मुलाचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
संतोष शंकर डांगे (वय १४) रा. लासीना, कळमनुरी असे या मुलाचे नाव आहे. संतोष हा कळमनुरी येथील शाळेत नववीमध्ये शिक्षण घेत होता. तो नेहमीप्रमाणे २ दिवसांपूर्वी शाळेत आला. मात्र यानंतर घरी परतलाच नसल्याने नातेवाईकानी संतोषचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, तो कुठेही सापडला नाही. त्यामुळे, अपहरण झाल्याची तक्रार कळमनुरी पोलिसांत दाखल केली गेली.