महाराष्ट्र

maharashtra

रस्त्यालगत नाले न केल्याने शेतात शिरले पाणी, संतप्त शेतकऱ्यांनी रोखला रस्ता

By

Published : Jun 14, 2020, 12:32 PM IST

मागील अनेक महिन्यांपासून औंढा ते वसमत या रस्त्याचे काम सुरू आहे. पण या रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने नालेच ठेवले नाहीत. त्यात मागील तीन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. या पावसाचे पाणी नाल्या नसल्याने थेट आजूबाजूच्या शेतात शिरले. खरीपाच्या पेरणीची तयारी करुन ठेवलेल्या शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले. पाण्यामुळे सुपिक गाळ वाहून गेला. तेव्हा शेतकऱ्यांनी रस्ता रोखला.

heavy rain in hingoli
रस्त्यालगत नाल्या न केल्याने शेतात शिरले पाणी, संतप्त शेतकऱ्यांनी रोखला रस्ता

हिंगोली - औंढा ते वसमत या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामादरम्यान रस्त्यालगत नाले करण्यात आले नाहीत. मात्त्यार, दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्यावरचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरले आहे. त्यामुळे प्रशासनावर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी या मार्गावरील वाहतूक अडवली. त्यामुळे यामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

शेतकऱ्यांनी औंढा-वसमत रस्ता अडवला...

मागील अनेक महिन्यांपासून औंढा ते वसमत या रस्त्याचे काम सुरू आहे. पण या रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने नालेच ठेवले नाहीत. त्यात मागील तीन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. या पावसाचे पाणी नाल्या नसल्याने थेट आजूबाजूच्या शेतात शिरले. खरीपाच्या पेरणीची तयारी करुन ठेवलेल्या शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले. पाण्यामुळे सुपिक गाळ वाहून गेला. तेव्हा शेतकऱ्यांनी रस्ता रोखला.

दरम्यान, संबंधित कंत्राटदाराने शनिवारी रात्री जेसीबीच्या साह्याने, पाण्यासाठी रस्ता तयार करुन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुसळधार पावसामुळे हे शक्य झाले नाही. या कारणाने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. दुसरीकडे कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथील रेल्वे पुलाखाली मोठ्या पाणी साचल्यामुळे या भागातील कारवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे.

हेही वाचा -हिंगोलीत वेगवेगळ्या घटनांमध्ये गळफास घेऊन दोघांची आत्महत्या

हेही वाचा -...म्हणून स्वाभिमान शेतकरी संघटनेने केली दगडांची पेरणी!

ABOUT THE AUTHOR

...view details