हिंगोली -हिंगोलीतील एका शेतकऱ्याने चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Hingoli Farmer Wrote Letter To CM Uddhav Thackeray ) यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रात या शेतकऱ्याने आपली कैफियत मांडली आहे. शेतकरी होऊन प्रेम करणं खरंच चुकीचं असतं का? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
शेतकऱ्याने काय म्हटले पत्रात -शेतकरी होऊन प्रेम करणं खरंच चुकीचं असतं का? असा सवाल एका प्रेम करणाऱ्या युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केला आहे. या पत्रात म्हटले की खरंतर तुम्हाला भेटून खूप रडावं वाटत आहे. उद्धवसाहेब, तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेता. त्यांचे प्रश्न सोडवता, माझं कसं काय? असंही या युवकानं म्हटलं आहे. हे पत्र समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.