महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात ८०.७७ टक्के निकाल, यंदाही मुलींनीच मारली बाजी

हिंगोली जिल्ह्यात ३४ परीक्षा केंद्रावरून १२ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात जिल्ह्यातील ८८२ वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

By

Published : May 29, 2019, 11:40 AM IST

हिंगोली जिल्ह्यात यंदाही मुलींनीच मारली बाजी

हिंगोली- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. हिंगोली जिह्याचा ८०.७७ टक्के निकाल लागला असून यंदाही मुलींनेच बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांप्रमाणेच हिंगोली जिल्ह्यातील मुलीही कमी नाहीत हेच या मुलींनी निकालातून दाखवून दिलं आहे.

हिंगोली जिल्ह्यात ३४ परीक्षा केंद्रावरून १२ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात जिल्ह्यातील ८८२ वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. वाणिज्य शाखेचा निकाल ९०. ४८ लागला असून ७९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १६७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ३९८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.


कला शाखेसाठी ६७६९विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ४ हजार ९९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ३४७ विषेश प्रविण्यासह तर २ हजार ४२६ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ७३.७५ टक्के कला शाखेचा निकाल लागला. विज्ञान शाखेसाठी ४६०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ४ हजार १३९ विध्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ८९.९० टक्के लागला आहे.

असा आहे तालुका निहाय निकाल -


वसमत ८३.१८ टक्के, कळमनुरी ८०.३० टक्के, सेनगाव ८०.४३ टक्के, हिंगोली ७९. १९ टक्के तर ओंढा ना. ७८.५५ टक्के निकाल लागला असून वसमत तालुक्याचा सर्वाधिक जास्त निकाल लागला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details