महाराष्ट्र

maharashtra

दोन दिवसाच्या प्रतीक्षेनंतर हिंगोलीत पावसाची जोरदार हजेरी

जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी एखाद्या चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करित होते. मात्र, आज झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पेरणीला गती येण्याचे चित्र आहे.

By

Published : Jul 2, 2019, 8:30 PM IST

Published : Jul 2, 2019, 8:30 PM IST

जोरदार पावसामुळे शेताजवळून ओसांडून वाहणारे पाणी

हिंगोली- जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी एखाद्या चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करित होते. मागील पाच ते सात दिवसापासून अधून-मधून जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही प्रमाणात शेतकरी पेरणी करुन घेत आहे. त्यातच आज झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पेरणीला गती येण्याचे चित्र आहे.

जोरदार पावसामुळे शेताजवळून ओसांडून वाहणाऱ्या पाण्याचे दृष्य


जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने शेतकरी चिंतातुर झालेला आहे. या वर्षीही मागील वर्षी सारखीच परिस्थिती असल्याने, खरिपाची पेरणी लांबणीवर गेली आहे. मृगनक्षत्र पूर्णता कोरडे गेल्याने डाळवर्गीय पिकाची पेरणी करणे शक्य नाही. आज रोजी खरिपाच्या पेरणीसाठी हिंगोली जिल्ह्याच्या २२६.८५ मिमी पावसाची अपेक्षा असताना अद्यापपर्यंत केवळ ६७.३७ मी.मी पाऊस झाला आहे. तर रविवारी केवळ ०.९२ टक्केच पाऊस झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. तसेच मागील वर्षी १ जून ते १ जुलै पर्यन्त हिंगोली जिल्ह्यात २४२.४२ मी.मी पाऊस पडला होता. यंदा या महिनाभराच्या कालावधीत केवळ ६८.३० मी. मी पाऊस झाला आहे. हा पेरणीयोग्य पाउस नसल्याने काही गावातील शेतकऱयांनी शेतात नांगरणी न केल्याचे चित्र आहे. त्यामुळे बियाने केंद्रातही ग्रहकांचा दुष्काळ दिसून येत आहे.


मात्र, आज दुपारी १२ च्या सुमारस जिल्ह्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग दहा मिनिटे सारखाच पाऊस सुरू होता. त्यामुळे रस्त्यावर व शेतात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. दिवसभर सुरू असलेल्या या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील विविध भागातील नदी नाले दुथडी भरून वाहत होते. या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी घाई करुन पेरणी केली, त्यांना या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. सेनगाव तालुक्यातील अनेक गावातील नदी नाल्या लगतच्या शेती खरडुन गेल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील गाळ वाहून गेल्याने त्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. एकीकडे पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा अन दुसरीकडे मात्र त्याच पावसाने सर्व शेती खरडून नेली आहे. त्यामुळे पेरणीहोण्या आगोदरच शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details