हिंगोली- जिल्ह्यात दोन दिवसीय दौऱ्यावर आलेले पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दुसऱ्या दिवशी टंचाईग्रस्त गावांना भेटी देण्यास सुरुवात केली. जयपूवाडी या गावाला भेट देऊन कांबळे यांनी पाणी टंचाईचा आढावा घेतला. ७०० लोकसंख्या असलेल्या जयपूवाडी येथे एक टँकरच्या तीन फेऱ्या आजपासूनच वाढविण्याच्या सूचना बीडीओंना दिल्या तर मालसेलू येथे देखील पाणी टंचाईचा आढावा घेत, त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना बीडीओंना दिल्या आहेत.
पालकमंत्री कांबळे यांनी पाण्याचा आढावा घेतला. सरकार, नागरिक आणि वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांनी एकत्र मिळून टंचाईवर मात करण्याचे आवाहन पालकमंत्री कांबळे यांनी केले. यावेळी पाणीटंचाई बाबतीत ग्रामस्थांच्या संपूर्ण अडचणी पालकमंत्री कांबळे यांनी ऐकून घेतल्या. त्यावर मुख्यमंत्री पेयजल योजनेत गावात योजना मंजूर झाल्याचे ग्रामसेवक रोहित पाटील व अभियंता नागरगोजे यांनी सांगितले. या योजनेचे ताबडतोब एस्टिमेट करून वरिष्ठ स्तरावर पाठवून देण्याचे आदेश पालकमंत्री कांबळे यांनी अभियंता नागरगोजे यांना दिले. तर काही शेतकऱ्यांचे कर्ज झाली नसल्याचे सांगताच, याठिकाणी पालकमंत्री यावर जिल्हाधिकारी सोबत बोलणार असल्याचे सांगितले. ग्रामस्थ पाणीटंचाई व्यतिरिक्त इतरही बाबी मांडण्याचा प्रयत्न करत होते मात्र पालकमंत्र्यांनी केवळ या बैठकीत टंचाई संदर्भातच बोला इतर दुसरे काही बोलू नका असे स्पष्ट शब्दात सुनावले.
स्वातंत्र्यानंतर पालकमंत्री पहिल्यांदाच मालसेलूत