महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नवसंजीवनी' योजनेलाही कीड; लाच घेताना कृषी सहायक रंगेहात 'चतुर्भूज' - सरकार

हिंगोली जिल्ह्यातील नानासाहेब देशमुख यांच्या नावाने सरकारने शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून मुक्त करण्यासाठी नवसंजीवनी योजना सुरू केली. मात्र याजनेत लाच घेण्याचा पहिलाच गुन्हा हिंगोलीतच दाखल करण्यात आला.

लाचलुचपत विभागाचे कार्यालय

By

Published : May 31, 2019, 5:55 PM IST

हिंगोली- शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून मुक्त करुन कृषी व्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी भारतरत्न नानाजी देशमुख कृषी नवसंजीवनी योजना सरकारने सुरू केली. मात्र या योजनेच्या लाभासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना कृषी सहायकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने औंढा येथे रंगेहात पकडले. पी. एस. राऊत असे लाच घेणाऱ्या कृषी सहायकाचे नाव आहे. या योजनेत लाच घेणारा हा पहिलाच कर्मचारी असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत विभागाचे कार्यालय


कृषी व्यवस्थेला नवसंजीवनी देण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून मुक्त करण्यासाठी आणि आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या योजनेचा असा उदात्त हेतू असताना देखील या योजनेचा लाभ देण्यासाठी संबंधित तक्रारदाराकडे कृषी सहायक राऊतने २१०० रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती दीड हजार रुपये पहिल्या टप्प्यात देण्याचे ठरवले. मात्र, तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केली.


लाचलुचपत विभागाने सापळा लावत आज राऊतला दीड हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक रवींद्र थोरात, निरीक्षक नितीन देशमुख, कर्मचारी अभिमन्यू कांदे यांनी केली.


नानाजी देशमुख हे हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असल्याने त्यांच्याच जिल्ह्यात सर्वाधिक जास्त लक्ष देऊन ही योजना राबविण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. मात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी लाच मागणारा हा पहिलाच कर्मचारी अडकला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details