महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात बीएसएनएलची 'बत्ती' गुल; ४४ लाखांच्या थकीत वीज बिलामुळे 70 टाॅवर पडले बंद - 70 BSNL Towers off out of 125 gondia

यंदा महावितरण विभागाने गोंदिया, तिरोडा, अर्जुनी-मोरगाव आणि सडक-अर्जुनी तालुक्यात बीएसएनएलला दणका दिला आहे. महावितरणने १२५ टॉवर पैकी ७० टॉवरची बत्ती गुल केली आहे. यामुळे संपुर्ण तालुक्यातच बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली असल्याने याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.

MSCDCL Cuts BSNL's electricity in gondia; 70 towers off out of 125
गोंदियात बीएसएनएलची बत्ती गुल

By

Published : Dec 12, 2019, 10:01 AM IST

गोंदिया - विद्युत बिल न भरल्याने भारतीय दूर संचार निगमला (बीएसएनएल) महावितरण विभागाने पुन्हा जोराचा झटका दिला आहे. महावितरणने जिल्ह्यातील बीएसएनएलच्या शहर आणि ग्रामीण भागातील १२५ टॉवर पैकी ७० टॉवर बंद केले. तर काही एक्सचेंजची बत्ती ही गुल केली आहे. बीएसएनएलची सुमारे ४४ लाखांच्या घरात थकबाकी असल्याने महावितरणने हे पाऊल उचलले आहे. मागील वर्षभरापासून बीएसएनएलची ही घरघर सुरू आहे. वीज बिलांची रक्कम थकवून ठेवत असल्याने महावितरणला वीज पुरवठा खंडीत करावा लागत आहे. यानंतर बीएसएनएलकडून पैसे भरले जातात. मात्र, काही महिन्यांनी पुन्हा वीज बिल थकविल्याने महावितरणला त्यांची बत्ती गुल करावी लागते.

गोंदियात बीएसएनएलची बत्ती गुल

यंदा महावितरण विभागाने गोंदिया, तिरोडा, अर्जुनी-मोरगाव आणि सडक-अर्जुनी तालुक्यात बीएसएनएलला दणका दिला आहे. महावितरणने १२५ टॉवर पैकी ७० टॉवरची बत्ती गुल केली आहे. यामुळे संपुर्ण तालुक्यातच बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली असल्याने याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. तसेच इंटरनेट पूर्णपणे बंद झाल्याने याचा फटका बँकांनाही बसत आहे. कधी काळी बीएसएनएलचे सीम किंवा टेलीफोन कनेक्शन घेण्यासाठी नागरिकांना प्रतिक्षेत रहावे लागत होते. मात्र, खासगी कंपन्या बाजारात आल्याने त्यातच शासनाने बीएसएनएलकडे दुर्लक्ष झाल्याने बीएसएनएलकडे पाठ फिरवली आहे.

हेही वाचा -..न भरलेल्या १ लाख ४४ हजारांचे बिंग फुटू नये म्हणून जाळले एटीएम

महावितरण आणि बीएसएनएलच्या कचाट्यात सर्वसामान्यांना अडचण होत आहे. 2 दिवसांपुर्वी शहरातील 3 कनेक्शन कापण्यात आले आहे. तसेच जवळपास ७० टॉवरची बत्ती गुल केली आहे. सर्व शासकीय कार्यालयांचे कामकाज आज ऑनलाईन झाले आहे. कार्यालयांमध्ये बीएसएनएलतर्फे इंटरनेट सुविधा दिली जाते. मात्र, वीज पुरवठा खंडीत असल्यामुळे इंटरनेट सेवा ठप्प असल्याने शासकीय कार्यालयांचे कामे सुध्दा ठप्प झाल्याचे चित्र आहे. तसेच बीएसएनएलकडून वारंवार बिलाची रक्कम थकविली जात असल्याने महावितरणला त्यांची वीज कापणे हाच पर्याय उरतो. मात्र, याचा फटका सर्वसामान्य, बँका यांना बसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा -आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर कोसळले; ग्राहकांना दिलासा, तर शेतकरी हवालदिल

या तालुक्यांमध्ये आहे इतकी थकबाकी -
गोंदिया (शहर) - 4 लाख
तिरोडा - 19 लाख
अर्जुनी मोरगाव - 18 लाख
सडक अर्जुनी - 3 लाख
एकूण - 44 लाख

ABOUT THE AUTHOR

...view details