महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, आठ महिन्यांपासून झाला नाही पगार - gondiya

अग्निशमन विभागात कार्यरत कंत्राटी अग्निशमन कर्मचाऱ्यांना कंत्राटदाराकडून मागील आठ महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

By

Published : Jul 12, 2019, 11:48 AM IST

गोंदिया- अग्निशमन विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंत्राटदाराकडून मागील आठ महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. परिणामी या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात नगर परिषद मुख्याधिकारी, नगर अध्यक्ष व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले.

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

अग्निशमन विभागात एका एजन्सीमार्फत कंत्राटी तत्वावर कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील आठ महिन्यांपासून कंत्राटदाराने पगार दिलेला नाही. परिणामी कंत्राटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे कर्मचारी कंत्राटदाराला पगार मागत असल्यास तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे. नगर परिषद पदाधिकारी व अधिकाऱ्यांना याबाबत माहिती असूनही ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. परिणामी अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.

या संदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील यांना विचारले असता, त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. नगर परिषदेकडून कंत्राटदाराला पैसे दिले गेले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार रखडले असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कर्मचाऱ्यांच्या कामबंदमुळे हानी होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details