महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जमीन देऊनही मोबदला नाही.. गोंदियाच्या बिर्शी विमानतळासमोर संतप्त १०६ कुटुंबियांकडून अतिक्रमण - Gondias Birshi Airport

बिर्शी विमानतळ प्राधिकरणाच्या मुख्य गेटसमोर राखीव असलेल्या १६ एकर जमिनीवर ( Birshi Airport 16 acres of land ) अतिक्रमण केले आहे. बिर्शी गावातील १०६ कुटूंबियांना प्रत्येकी २५०० फूट जागेवर आज अतिक्रमण करत तिथे प्लॉटिंग करून घेतले आहे. तर मंगळवारपासून त्या जागेवर १०६ कुटूंबीय त्या जागेवर सामूहिक भूमिपूजन सोहळा करीत गृह निर्माणाला Bhumi Pujan at Birshi airport ) सुरुवात करणार आहेत.

१०६ कुटुंबियांकडून अतिक्रमण
१०६ कुटुंबियांकडून अतिक्रमण

By

Published : Mar 21, 2022, 10:25 PM IST

Updated : Mar 22, 2022, 8:58 AM IST

गोंदिया -गोंदिया शहराला लागून असलेल्या बिर्शी विमानतळाकरिता १३ वर्षापूर्वी १०६ कुटुंबीयांनी ( 106 families compensation issue in Birshi ) जमीन आणि घरे विमान प्राधिकरणाला ( Aviation Authority for Birshi Airport ) दिली आहेत. त्यांचा योग्य मोबदला मिळेल या आशेने आपली जमीन व घरे येथील दिली होती. मात्र, १३ वर्षे लोटली तरी कुटुंबांना योग्य तो मोबदला मिळालेला नाही.

संतापलेल्या ग्रामस्थांनी अखेर बिर्शी विमानतळ प्राधिकरणाच्या मुख्य गेटसमोर राखीव असलेल्या १६ एकर जमिनीवर ( Birshi Airport 16 acres of land ) अतिक्रमण केले आहे. बिर्शी गावातील १०६ कुटुंबियांना प्रत्येकी २५०० फूट जागेवर आज अतिक्रमण करत तिथे प्लॉटिंग करून घेतले आहे. तर मंगळवारपासून त्या जागेवर १०६ कुटूंबीय त्या जागेवर सामूहिक भूमिपूजन सोहळा करीत गृह निर्माणाला ( Bhumi Pujan at Birshi airport ) सुरुवात करणार आहेत.

बिर्शी विमानतळासमोर संतप्त १०६ कुटुंबियांकडून अतिक्रमण

हेही वाचा-Kolhapur By Election : मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर राजेश क्षीरसागरांची प्रतिक्रिया; म्हणाले, मी नाराज नव्हतो मात्र...

२००५ पासून भूमी अधिग्रहणाला सुरुवात
गोंदिया शहराला लागून असलेल्या बिर्शी गावात ब्रिटिशकालीन विमानातळ होते. मात्र स्वातंत्र्यापूर्वी येथे असलेले विमानतळ नासधूस झाले होते. माजी केंद्रीय उद्यान मंत्री प्रफुल पटेल यांनी उद्यान मंत्र्यालयाची धुरा सांभाळतातच या बिर्शी गावात २००९ साली सूसूज विमानतळ तयार केला. यासाठी २००५ पासून भूमी अधिग्रहणाला सुरुवात झाली होती.

१०६ कुटुंबियांकडून अतिक्रमण

हेही वाचा-Mahesh Tapase Letter To PM Modi : 'राज्य सरकार आणि मनपाच्या बसेसना डिझेल दरवाढीतून सूट देण्यात यावी'

१०६ कुटुंबीयांचे ताबा मिळविण्यासाठी अतिक्रमण

एकट्या बिरसी गावातील ९७ हेक्टर शेत जमीन तसेच अंदाजे ३ लक्ष १८ हजार चौरस फूट जागा विमानतळ प्राधिकरणाने आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यांना योग्य मोबदला मिळणार असल्याचे आश्वासनदेखील देण्यात आले होते. मात्र, आज या घटनेला १३ वर्षाचा कालावधी लोटला असला तरी या प्रकल्पग्रस्त नागरिकांना न्याय न मिळाल्याने संतापललेया १०६ कुटुंबीयांनी विमानतळ प्राधिकरणाच्या गेट समोरच आपल्या निवासाकरिता ताबा मिळविण्यासाठी अतिक्रमण केले आहे.

१०६ कुटुंबियांकडून अतिक्रमण
हेही वाचा-Mumbai Corona Update : मुंबईत सोमवारी २८ नवे रुग्ण, शून्य मृत्यूची नोंद

दरम्यान, जिल्हा प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे.

Last Updated : Mar 22, 2022, 8:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details