महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 16, 2019, 9:30 PM IST

Updated : Apr 16, 2019, 11:18 PM IST

ETV Bharat / state

गडचिरोली-चिमुर मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला, पोलिसांच्या ‘ऑपरेशन हिम्मत'मुळे निवडणूक यशस्वी

निवडणूक काळात १० आणि ११ एप्रिलला २ ठिकाणी झालेल्या भूसुरुंग स्फोटात गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफचे प्रत्येकी २ जवान जखमी झाले होते. त्यानंतर त्याठिकाणी तैनात असलेल्या जवानांनी शौर्यपूर्ण कामगिरी बजावत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. यामुळे पोलीस अधिक्षकांनी तैनात असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना रोख स्वरुपात बक्षीस जाहीर केले. एवढेच नाहीतर १५ एप्रिलला वटेली, गर्देवाडा, पुस्कोटी, वांगेतुरी या दुर्गम भागात मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.

मतदान केंद्रावर तैनात असलेले पोलीस

गडचिरोली- जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी 'ऑपरेशन हिम्मत' राबवण्यात आले होते. पोलिसांनी नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवत हे ऑपरेशन फत्ते करण्यात यश मिळवले. त्यामुळेच गेल्या २०१४ च्या निवणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत अडीच टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मतदान केंद्रावर तैनात असलेले पोलीस

जिल्ह्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून 'ऑपरेशन हिंमत' राबविण्यात आले होते. या माध्यमातून गडचिरोली पोलीस दलाने जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील ५९१ गावांना ग्रामभेटी दिल्या. ६१ जनजागरण मेळाव्याच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या मनामध्ये जागरुकता निर्माण केली. त्याचबरोबर ८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त शहरात नक्षलवाद विरोधात आणि मतदार जागृतीसाठी तब्बल १२ हजार महिलांच्या सहभागाने ७ ते ८ किमीपर्यंत ‘बेबी मडावी आदिवासी महिला विकास साखळी' साकारण्यात आली. त्याचे यशस्वी आयोजन गडचिरोली पोलिसांनीच केले होते. परिणामी महिलांनी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला.

मुक्तीपथाच्या साथीने गडचिरोली पोलीस दलाने ‘दारूमुक्त निवडणूक' यशस्वी करण्यात आली. पोलिसांनी या कालावधीत १० हजार ३४० लिटर दारू आणि १ कोटी २४ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले. याचबरोबर ३४१ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच सी-६० चे जवान, जलद प्रतिसाद पथकाचे जवान, विविध पोलीस ठाण्यांत तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी नक्षलवादाविरोधात राबवलेल्या आक्रमक अभियानांमुळे निवडणुकीच्या काळात नक्षलवाद्यांच्या वाढत्या कारवायांवर अंकुश ठेवण्यात यश मिळाले.

निवडणूक काळात १० आणि ११ एप्रिलला २ ठिकाणी झालेल्या भूसुरुंग स्फोटात गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफचे प्रत्येकी २ जवान जखमी झाले होते. त्यानंतर त्याठिकाणी तैनात असलेल्या जवानांनी शौर्यपूर्ण कामगिरी बजावत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. यामुळे पोलीस अधिक्षकांनी तैनात असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना रोख स्वरुपात बक्षीस जाहीर केले. एवढेच नाहीतर १५ एप्रिलला वटेली, गर्देवाडा, पुस्कोटी, वांगेतुरी या दुर्गम भागात मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.

Last Updated : Apr 16, 2019, 11:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details