गडचिरोली - लोकसभा निवडणूक तोंडावर असताना गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जाळपोळ सत्र सुरू केले आहे. शुक्रवारी दुपारी रस्ता कामावरील दोन ट्रॅक्टर व एक जेसीबी नक्षलवाद्यांनी जाळल्याची घटना कुरखेडा तालुक्यातील हुरीयालदंड येथे घडली. ३ दिवसातील ही दुसरी घटना असून मंगळवारी मध्यरात्री एटापल्ली तालुक्यातील पुस्तके येथे चार वाहने नक्षलवाद्यांनी जाळली होती.
गडचिरोलीत निवडणुकीच्या तोंडावर नक्षलवाद्यांकडून अग्निकांड.. तीन वाहने जाळली - नक्षलवादी
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून 11 एप्रिलला गडचिरोलीत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांकडून जाळपोळ सत्र सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून 11 एप्रिलला गडचिरोलीत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांकडून जाळपोळ सत्र सुरू आहे. मालेवाडा पोलीस मदत केंद्र अंतर्गत येत असलेल्या हुरीयालदंड ग्रामपंचायतीच्या हद्दीत रस्त्याचे काम सुरू होते. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास कामाच्या स्थळी नक्षलवाद्यांनी येऊन दोन ट्रॅक्टर व एका जेसीबीला आग लावून दिली. या घटनेत वाहने जळून खाक झाली. ३ दिवसातील ही जाळपोळीची दुसरी घटना आहे.
रविवारी कोरची तालुक्यातील कोटगुल पोलिस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात गडचिरोली येथील नगर परिषद शाळेत कार्यरत एका कंत्राटी शिक्षकाची नक्षल्यांनी हत्या केली होती. या घटनेमुळे नागरिकांत दहशत पसरली असून नक्षलवादी कारवाया रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान या निवडणुकीत आसनार आहे.