गडचिरोली - छत्तीसगड राज्याप्रमाणे जिल्ह्यातही जिल्हा निर्माण समिती तयार करावी तसेच १०० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी राज्य शासनाकडे केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. ते बुधवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
जिल्ह्यात नक्षली चळवळीमुळे रस्ते, पुल तसेच अन्य कामे करण्यास अडथळे येत आहेत. नक्षल्यांकडून वारंवार होणाऱ्या जाळपोळीमुळे कंत्राटदारही कामे बंद करतात. यामुळे कामाच्या ठिकाणी संरक्षण पुरवून कामे पूर्णत्वास नेण्यास पोलीस विभाग पूर्णपणे सहकार्य करत आहे. मात्र, जिल्हा निर्माण समिती तयार केली तर ही कामे अधिक गतीने होतील, त्यामुळे पोलिसांनी याबाबतची मागणी सरकारकडे केली आहे.