महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'जीवनावश्यक वस्तूंबाबत प्रशासनाकडून उपाययोजना; नागरिकांनी गर्दी करू नये'

संचारबंदीनंतर सामान्य जनजीवन काही प्रमाणात बिघडले आहे. परंतू आपणाला आता हळूहळू घरी राहण्याची सवय लावावी लागेल. पुढचे २० दिवस महत्त्वाचे आहेत, आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजातील प्रत्येक घटकासाठी या जागतिक संसर्गाला लढा देणे आता गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले.

By

Published : Mar 25, 2020, 7:39 PM IST

gadchiroli collector on corona and essential needs
'जीवनावश्यक वस्तूंबाबत प्रशासनाकडून उपाययोजना; नागरिकांनी गर्दी करू नये'

गडचिरोली - राज्यात संचार बंदी ही अगोदरच लागू झाली होती, आता सर्व भारतात आहे. आपल्या जिल्ह्यात नागरिकांनी करोना संसर्ग रोखण्यासाठी काळजी करावी, प्रशासन जीवनावश्यक वस्तूंबाबत आवश्यक उपाययोजना राबवत आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.

जिल्ह्याबाहेरुन आलेल्या नागरिकांच्या हातावर शिक्का मारताना आरोग्य कर्मचारी

आवश्यक दैनंदिन उपयोगाच्या वस्तू नागरिकांना वेळेत मिळण्यासाठी दुकाने सुरू आहेत. भाजीपाला, दूध व किराणा दुकानांमध्ये साठा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नका. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपण संचारबंदी केली आहे. बाहेर पडताना आवश्यक काळजी घ्या. इतर लोकांपासून आवश्यक अंतर ठेवून राह, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

जिल्ह्याबाहेरुन आलेल्या नागरिकांच्या हातावर शिक्का मारताना आरोग्य कर्मचारी

अकारण बाहेर फिरण्यावर स्वत:हून बंदी घाला, पोलिसांना सहकार्य करा नाहीतर नाईलाजास्तव त्यांना सक्तीने कारवाई करावी लागेल. कोरोना संसर्गाची काळजी प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. संचारबंदी नंतर सामान्य जनजीवन काही प्रमाणात बिघडले आहे. परंतू आपणाला आता हळूहळू घरी राहण्याची सवय लावावी लागेल. पुढचे २० दिवस महत्त्वाचे आहेत, आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजातील प्रत्येक घटकासाठी या जागतिक संसर्गाला लढा देणे आता गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

जिल्ह्याबाहेरुन आलेल्या नागरिकांच्या हातावर शिक्का मारताना आरोग्य कर्मचारी
जिल्ह्यात १३ लोक घरीच क्वारेंटाईनमध्ये असून जिल्ह्याबाहेरून आलेल्या ५९५० लोकांच्या हातावर शिक्के मारण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाबाधित क्षेत्रातून आलेल्या मागील १५ दिवसांमधील लोकांवर आरोग्य विभाग नजर ठेवून आहे. काल मंगळवारपासून त्यांच्या हातावर शिक्के मारून त्यांना निरीक्षणाखाली घेणेत येत आहे. दैनंदिन भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होवू नये यासाठी पालिकेने पांढऱ्या रेषा आखून दिले असून ठराविक अंतर ठेवणे सक्तीचे केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details