महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 19, 2020, 10:33 AM IST

ETV Bharat / state

विदेशातून परतणारे 21 जण लोकसंपर्कापासून दूर; प्रशासनाचा खबरदारीचा उपाय

गडचिरोली जिल्ह्यात अद्याप कोणालाही कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून विदेशातून आलेल्या 21 जणांना आपल्या घरातच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या आहेत.

Corona News
कोरोना न्यूज

गडचिरोली - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग गडचिरोली जिल्ह्यात अद्याप कोणालाही झालेला नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून विदेशातून आलेल्या 21 जणांना आपल्या घरातच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून खर्रा, गुटखा विक्री आणि साठा करण्यासाठी एक वर्षांची बंदी घातली आहे, तर आधार केंद्र 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

विदेशातून परतणारे 21 जण लोकसंपर्कापासून दूर

कोरोना बाधीत असलेल्या दुबई, चीन, अमेरिका अशा वेगवेगळ्या देशांमधून पर्यटन आणि इतर कारणासाठी जावून आलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ते कोरोना बाधित नसल्याचा वैद्यकीय अहवाल आला आहे. कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेता, त्यांना 14 दिवस लोकांपासून दूर ठेवण्यात आले आहे. हे नागरिक गडचिरोली शहरातील कुरखेडा, मुलचेरा आणि इतर काही तालुक्यातील रहिवासी आहेत.

हेही वाचा -CORONA: दिंडोरी तालुक्यातील मोहाडीत कोरोना संशयित आढळल्याने खळबळ

या नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. कुठल्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करावी, अशा सुचना प्रशासनाच्यावतीने त्यांना करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 17 मार्च पासून लागू करण्यातबाबत अधिसूचना जारी केली आहे. यानुसार महाराष्ट्र राज्यात खर्रा, सुगंधी तंबाखू, गुटखा, मसाला सुगंधीत सुपारीचे उत्पादन, साठवणूक, वितरण व विक्रीवर एका वर्षा करता प्रतिबंध जारी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details