धुळे - तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री आठ वाजता दूरदर्शनवरून देशाला संबोधित केले होते. यात त्यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली आणि सर्वांनाच धक्का बसला. देशातील काळा पैसा आणि नकली नोटांची समस्या संपवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सरकारने सांगितले. तील वर्षे उलटली असली तरी हा निर्णय आजही लोकांसाठी चर्चेचा विषय आहे.
मोदी सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या नोट बंदीच्या निर्णयाबाबत सर्वसामान्य नागरिकांमधून मात्र आजही विरोध व्यक्त होताना दिसून येत आहे. नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था ही खिळखिळी झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. व्यापारी वर्गाला देखील याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून नोटबंदीचे कोणतेही उद्दिष्ट साध्य झालेले नाही. याउलट भारतीय अर्थव्यवस्था आणखी धोक्यात आली आहे, अशा प्रतिक्रीया धुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केल्या आहेत.