महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 6, 2019, 3:26 PM IST

ETV Bharat / state

धुळ्यातील पांझरा नदीच्या पुरामुळे नागरिकांचे नुकसान; मदतीसाठी नुकसानग्रस्त रस्त्यावर

पांझरा नदीच्या पुरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नागरिकांना प्रशासनाने मदत करावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे. मात्र याकडे प्रशासनाने अद्याप लक्ष न दिल्याने संतप्त नागरिकांनी मंगळवारी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.

प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा

धुळे- शहरील पांझरा नदीच्या पुरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नागरिकांना प्रशासनाने मदत करावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे. मात्र याकडे प्रशासनाने अद्याप लक्ष न दिल्याने संतप्त नागरिकांनी मंगळवारी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.

पुरामुळे नागरिकांचं नुकसान

धुळे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे मध्यम आणि अन्य जलप्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परिणामी पांझरा नदीला पूर आला असून या पुरामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पुराचा पांझरा नदीकाठावरील घरांना देखील फटका बसला आहे. नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

घरातील संसारपयोगी साहित्य वाहून गेले असल्याने नागरिक रस्त्यावर आले आहेत. मात्र नागरिकांच्या या समस्येकडे प्रशासनाने अद्यापही लक्ष दिलेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी सकाळी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाने नुकसानग्रस्त नागरिकांना मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details