धुळे - जिल्हा परिषद निवडणुकीसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने भाजपने बिनविरोध जागा मिळवल्या, असा आरोप माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे. अनिल गोटे यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
धुळे जिल्हापरिषद निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया होत आहे. या पार्श्वभूमीवर अनिल गोटे यांनी भाजपवर घणाघाती आरोप केले. निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांच्या संगनमताने शिरपूर येथे भाजपने बिनविरोध जागा मिळवल्या. भाजप सरकार हे आत्तापर्यंतचे सर्वांत भ्रष्ट सरकार आहे, मी हे पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो, असेही गोटे म्हणाले.