नियंत्रण सुटल्याने ट्रकची चार दुचाकींना धडक; जीवितहानी टळली - चंद्रपूर अपघात वृत्त
नियंत्रण सुटलेल्या ट्रकने राजुरा रेल्वे उड्डाण पूलाजवळ उभ्या असणाऱ्या चार दुचाकींना धडक दिली. यात चारही वाहने चक्कनाचूर झाली असून जीवितहानी टळली आहे. मात्र या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
![नियंत्रण सुटल्याने ट्रकची चार दुचाकींना धडक; जीवितहानी टळली chandrapur accidents](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7626881-thumbnail-3x2-chandrapur.jpg)
नियंत्रण सुटलेल्या ट्रकने राजुरा रेल्वे उड्डाण पूलाजवळ उभ्या असणाऱ्या चार दुचाकींना धडक दिली.
चंद्रपूर -नियंत्रण सुटलेल्या ट्रकने राजुरा रेल्वे उड्डाण पूलाजवळ उभ्या असणाऱ्या चार दुचाकींना धडक दिली. यात चारही वाहने चक्कनाचूर झाली असून जीवितहानी टळली आहे. मात्र, या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
नियंत्रण सुटलेल्या ट्रकने राजुरा रेल्वे उड्डाण पूलाजवळ उभ्या असणाऱ्या चार दुचाकींना धडक दिली.
राजुरावरून छत्तीसगडच्या दिशेने जाणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटले; आणि पुलाजवळील दुचाकींना धडक दिली. यानंतर चालकाने रस्त्याच्या बाजूला ट्रक उभा केला. मात्र धडकेत चार दुचाकी चकनाचूर झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच राजुरा वाहतूक शाखेतील प्रशांत शेंडे, उमेश रामटेके, प्रकाश जुनघरे यांनी घटनास्थळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू केली आहे.