महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वंचित बहुजन आघाडीची मागणी अशक्य; तोडगा नाही : सुशीलकुमार शिंदे - Chandrapur

ते खासगी कार्यक्रमासाठी चंद्रपुरात आले होते. बहुजन वंचित आघाडी हे भाजपचे पिल्लू आहे की नाही, हे आताच सांगणे अवघड असले तरी, भाजपकडून असे प्रयत्न नेहमीच होतात.

वंचित बहुजन आघाडीची मागणी अशक्य; तोडगा नाही : सुशीलकुमार शिंदे

By

Published : Mar 18, 2019, 12:09 AM IST

चंद्रपूर - वंचित बहुजन आघाडीसोबत तोडगा काढण्यासाठी काँग्रेसने खूप प्रयत्न केले. मीही या प्रक्रियेत सामील होतो. मात्र, त्यांच्या मागण्या आणि उद्देश हे अवाजवी होते, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीसोबत कुठलाही तोडगा निघाला नसल्याची स्पष्टोक्ती माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीची मागणी अशक्य; तोडगा नाही : सुशीलकुमार शिंदे

ते एका खासगी कार्यक्रमासाठी चंद्रपुरात आले होते. बहुजन वंचित आघाडी हे भाजपचे पिल्लू आहे की नाही, हे आताच सांगणे अवघड असले तरी, भाजपकडून असे प्रयत्न नेहमीच होतात. काँग्रेसची मते कापण्याचा प्रयत्न केला जातो, असे सांगत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वंचित आघाडीच्या हेतूवर अप्रत्यक्ष संशय व्यक्त केला. शिंदे आज एका वैयक्तिक कार्यक्रमासाठी चंद्रपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

प्रकाश आंबेडकर हे सोलापुरातून लढणार असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, निवडणुकीच्या रणांगणात पुढे कोण आहे, याचा विचार करायचा नसतो. फक्त लढायचे असते. मी आजवर तेरा निवडणुका लढलो. त्यामुळे कोण पुढे आहे, याचा विचार मी करत नाही. वंचित आघाडीशी आता आघाडी होईल, असे वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आज चौकीदार म्हटले की समोरून चोर असा आवाज येतो. त्यामुळे चौकीदार शब्दाला कशारीतीन लोक घेत आहेत, हे दिसून येते. विखे यांच्या मुलाने भाजप प्रवेश केला, यात आश्चर्य काहीच नाही, असे सांगत त्यांनी यावर फार बोलणे टाळले.

ABOUT THE AUTHOR

...view details