महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dera Movement Case : डेरा आंदोलन मागे घेण्याचे समन्स; पप्पू देशमुख करणार ईडीकडे तक्रार

जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख (Janvikas Sena President Pappu Deshmukh) यांनी 15 महिन्यांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचारी, कोविड योद्ध्यांच्या थकीत पगारासाठी डेरा आंदोलन (Dera movement) सुरू केले. सदर आंदोलन मागे घेण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली (Notice to Pappu Deshmukh) आहे. आंदोलन मागे न घेतल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही नोटीसमधून दिला आहे. या संदर्भात पप्पू देशमुख यांनी सांंगितले की, हा आमच्यावर सूड उगवण्याचा प्रयत्न आहे, अशा नोटीसांना आम्ही भीक घालत नाही. आम्ही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने (Collector Ajay Gulhane), पोलीस अधीक्षक अरविंद साळवे (SP Arvind Salve) यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार करणार आहे.

By

Published : Jun 13, 2022, 12:40 PM IST

Pappu Deshmukh President Janvikas Sena
पप्पू देशमुख अध्यक्ष जनविकास सेना

चंद्रपूर : मागील १५ महिन्यांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचारी, कोविड योद्ध्यांच्या थकीत पगारासाठी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात डेरा आंदोलन सुरू आहे. सदर आंदोलन मागे घेण्यासाठी रामनगर पोलिसांनी पप्पू देशमुख यांना नोटीस बजावली आहे. आंदोलन मागे न घेतल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही नोटीसमधून दिला आहे. पप्पू देशमुख यांचे म्हणणे आहे की, दारूच्या अवैध दुकानांच्या विरोधात जे आंदोलन पुकारले आहे. त्याचा सूड घेण्यासाठी प्रशासन नाहक त्रास देत आहे. मात्र, अशा दबावाला आम्ही अजिबात बळी पडणार नाही. या संदर्भात आपण जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार करणार आहे.

जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख

शासकीय नोटीसला विरोध : जिल्ह्यात १ ते १५ जूनपर्यंत जमावबंदी असल्याचे तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने व पावसाळ्यामुळे आंदोलनाचा मंडप पडून हानी होण्याची शक्यता असल्याने आंदोलन मागे घ्यावे, असा उल्लेख नोटीसमध्ये नमूद आहे. मात्र, १६ महिन्यांपासून सुरू असलेल्या डेरा आंदोलनाने अनेक वेळा पाऊस आणि वादळाचा अनुभव घेतला आहे. या दरम्यान अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याकरिता जमावबंदीचे आदेश काढले आहेत. एवढेच नव्हे तर मागील जवळपास१० महिन्यांपासून डेरा आंदोलनाचेप्रकरण न्यायप्रविष्ट आहे. नोटीसमध्ये दिलेली सर्व कारणे अनेक महिन्यांपासून लागू असताना आताच पोलीस विभागाने नोटीस कशी बजावली, असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला. पोलीस अधीक्षक व दोन पोलीस अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर लेखी तक्रार केल्याने नोटीस पाठवून धमकावण्याचा प्रकार पोलीस अधिकारी करीत आहेत. अशा धमक्या व सूडबुद्धीच्या कारवाईला आपण भीक घालत नाही, अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली.


अधिकाऱ्यांची ईडीकडे तक्रार करणारच :कायदेशीर मार्गाने आंदोलन सुरू आहे. ते उठविण्यासाठी असा प्रकार सुरू आहे. परंतु, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या धमक्यांना आपण भीक घालत नाही. कोणी कितीही दबाव आणला तरी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मदन पाटील व मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची पुराव्यानिशी 'ईडी'कडे तक्रार करणार असल्याचे पुन्हा एकदा देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकातून जाहीर केले आहे.



440 व्होल्टचा झटका देणार :जिल्ह्यात राजरोसपणे दारू, रेती, कोळसा, सुगंधित तंबाखू व गुटख्याच्या अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या बातम्या विविध माध्यमांमधून येत आहेत. या अवैध व्यवसायिकांना संरक्षण घेऊन करोडो रुपयांची माया जिल्ह्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जमवली आहे. मूल मार्गावर एक अधिकारी करोडो रुपयांची गुंतवणूक करून रिसॉर्ट तयार करीत असल्याची तर काही अधिकाऱ्यांनी नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील जमिनींमध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग व इतर काही विभागातील अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची जंत्री तयार करणे सुरू असून, लवकरच यांना कायद्याचा वापर करून ४४० होल्टेजचा झटका देणार असल्याचे देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केले आहे.

हेही वाचा :चांदुर रेल्वेत घरकुल योजनेतील निधीसाठी नगर परिषदेवर "डेरा आंदोलन"

ABOUT THE AUTHOR

...view details